दिल्लीत किसान क्रांती यात्रेचा मोर्चा उधळून लावण्यासाठी पॅरामिलिटरी तैनात

नवी दिल्ली : दिल्ली सध्या किसान क्रांती यात्रेने तापली आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी भारतीय किसान युनियनच्या आंदोलकांना भाजप सरकारच्या जुलमी कारवाईला सामोरे जावं लागत आहे. मोर्चेकऱ्यांनी उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या यात्रेला सुरुवात केली होती. दरम्यान त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आलं असून पोलिसांकडून तुफान पाण्याचा मारा करण्यात येत आहे.
पोलिसांसोबत आरपीएफ आणि पॅरामिलिटरी तैनात करून पूर्व दिल्लीच्या अनेक भागात कलम १४४ लागू करून जमावबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर्स घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. यूपीच्या सीमेवर सर्व शेतकरी आंदोलक एकत्रं येताच सरकारने जमावबंदी करायला सुरुवात केली आणि मोर्चा दाबण्याचा प्रयत्नं केला.
शेतकऱ्यांचा मोर्चा उलथून लावण्यासाठी यूपीचे सीमेवर इतका पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे की, शेतकरी काय दहशदवादी आहेत काय असा थेट प्रश्न शेतकरी नेते नरेश टीकेत यांनी उपस्थित केला आहे. मागील तीस वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये महेंद्रसिंह टीकेत यांनी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढून दिल्ली सरकार हलवलं होत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं