अंडर १९ विश्वचषक चौथ्यांदा टीम इंडियाकडे : टीम पृथ्वी विजयी

न्यूझीलंड : बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या टीमला अवघ्या ३८.५ षटकात नमवून टीम इंडियाने चौथा अंडर १९ विश्वचषक जिंकला. टीम पृथ्वी समोर एकूण २१७ धावांचे लक्ष समोर ठेवण्यात आले होते. भारताने तब्बल ८ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा अगदी सहज पराभव केला.
यात महत्वाची भूमिका बजावली ती मनजोत कालरच्या धडाकेबाज शतकाने. मनजोतने एकूण १०१ चेंडूत १०२ धावा करत नाबाद राहण्याची महत्वाची खेळी केली. त्यामुळे भारताचा हा चौथा अंडर १९ विश्वचषक ठरला आहे.
अंडर १९ टीम इंडियाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनजोतने चांगली सुरुवात करून दिली. परंतु पृथ्वी शॉ २९ धावांवर बाद झाल्यावर मनजोतने संयमाने खेळ करायला सुरुवात केली आणि भारताला भक्कम स्थितीत उभे केले. शुबमन गिल ३१ धावा करत बाद झाला.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु जोनाथन मेर्लो च्या ७६ धावांची धमाकेदार फलंदाजी वगळता एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू चमकदार कामगिरी करू शकला नाही आणि अखेर बलाढ्य टीम इंडियासमोर केवळ २१६ धावांचे लक्ष ठेवले.
भारतीय गोलंदाजांनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली आणि शेवट पर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर नियंत्रण ठेवलं. कमलेश, ईशान आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूत पाठवले.
An inside look at India’s celebrations immediately following the 2018 #U19CWC final in Tauranga! ???????? pic.twitter.com/iwDsGLb1WP
— ICC (@ICC) February 5, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं