संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी फक्त बाता मारून मराठी माणसाला फसवलं

मुंबई : स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
सत्ताकाळात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केवळ बाता मारून मराठी माणसाची घोर फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मुंबईची महानगरपालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असून येथे घर खरेदी करणे मराठी माणसाला शक्य झाले नाही. शिवसेनेकडून जे काही झालं ते केवळ मातोश्रीच्या हिताचं झालं आणि त्यात मराठी माणसाचं कोणताही हित नसल्याचा घणाघात यावेळी खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तसेच आमचा पक्ष ज्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवेल तिथे तो पूर्ण ताकदीने शिवसेना उमेदवाराच्या विरोधात जिंकण्यासाठीच मैदानात उतरेल असे देखील यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात सर्वच पक्ष शिवसेनेवर तुटून पडतील अशी शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं