Brand Rahul Gandhi | मोदींना 10 वर्षात जमलं नाही! पण 'राहुल है तो ही मुमकिन है!' कर्नाटकला दिलेली आश्वासने पुढील 1-2 तासात पूर्ण होणार

Brand Rahul Gandhi | एकाबाजूला मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासनं देऊन सत्तेत आलं आहे. त्यात महागाई कमी करणे, प्रति वर्ष २ कोटी लोकांना रोजगार देणे आणि भ्रष्टाचार कमी करणे असे आणि इतर अनेक वचन जनतेला दिली होती. मात्र मोदी पंतप्रधान पदी सलग १० वर्ष विराजमान होऊनही जनतेसाठी परिस्थिती अजून कठीण झाल्याचं पाहायला मिळतंय.
२०१४ पासून आजपर्यंत महागाईने तर कळस गाठलाय, बेरोजगारी वेगाने वाढते आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं सोडाच उलट शेतकऱ्यांची अवस्था अजून बिकट झाली आहे. मात्र आता पुढील निवडणुकीपूर्वी लोकांना दिलेली वचन पुन्हा प्रकाशझोतात येऊ नयेत म्हणून देव-धर्म आणि जातीच्या नावावर विषय उकरून जनतेच्या मूळ मुद्यांना दुर्लक्षित करून सत्तेत पुन्हा येण्याची येण्याची योजना आखली जातं आहे का असंच वातावरण आहे. मात्र कर्नाटकातील जनता शहाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे, वचन देणं आणि त्याच पालन करण्यात राहुल गांधी सच्चे सिद्ध झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी त्यांनी वेळ दिला आहे केवळ १-२ तासांचा.
आज कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
पाचही आश्वासने येत्या एक-दोन तासात पूर्ण होतील
शपथविधी नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. काँग्रेस पक्षाने निवडणुकीदरम्यान दिलेली पाचही आश्वासने येत्या एक-दोन तासात पूर्ण केली जातील, अशी घोषणा त्यांनी याच व्यासपीठावरून केली. त्याचबरोबर आपल्या ‘भारत जोडो यात्रे’चा उल्लेख करताना ते म्हणाले की, यात आम्ही द्वेष नष्ट केला आणि प्रेम जिंकले. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकने लाखो प्रेमाची दुकाने उघडली आहेत.
आम्ही खोटी आश्वासने देत नाही
राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून घोषणा केली की, आम्ही तुम्हाला 5 आश्वासने दिली होती. मी म्हणालो की आम्ही खोटी आश्वासने देत नाही. आम्ही जे म्हणतो ते करतो. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक 1-2 तासात होणार असून त्या बैठकीत ही 5 आश्वासने कायद्यात रूपांतरित होतील.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “मी कर्नाटकच्या जनतेचे मनापासून आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही काँग्रेसपक्षाला पूर्ण पाठिंबा दिला. गेल्या पाच वर्षांत तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले हे तुम्हाला आणि मला माहित आहे. ही निवडणूक काँग्रेस पक्षाने का जिंकली, असे माध्यमांमध्ये लिहिले होते. या विजयाचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे काँग्रेस कर्नाटकातील गरीब, मागास, दलितांच्या पाठीशी उभी राहिली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News title: Five promises made to people of Karnataka will be fulfilled in next 1 2 hours said Rahul Gandhi check details on 20 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं