Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र विरोधात RBI'ची मोठी कारवाई, बँकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Bank of Maharashtra
- ‘या’ बँकांना ठोठावला मोठा दंड
- 7 सहकारी बँकांना ही दंड ठोठावण्यात आला
- बँक ऑफ महाराष्ट्रवर किती दंड ठोठावण्यात आला?
- बँक ऑफ महाराष्ट्र
- बँकेच्या खातेदारांवर काय परिणाम होणार?

Bank of Maharashtra | महत्वाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने तीन खासगी बँकांसह १० बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. ज्या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे, त्यात अनेक बड्या नावांचा समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन न केल्याबद्दल जम्मू-काश्मीर बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि अॅक्सिस बँकेला मोठा दंड ठोठावला आहे. याशिवाय 7 सहकारी बँकांवर ही दंड ठोठावण्यात आला आहे.
‘या’ बँकांना ठोठावला मोठा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई करत देशातील बड्या बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक आणि जम्मू-काश्मीर बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. क्रेडिट कार्डनियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
7 सहकारी बँकांना ही दंड ठोठावण्यात आला
याशिवाय 7 सहकारी बँकांना ही दंड ठोठावण्यात आला आहे. २६ जून रोजी रिझर्व्ह बँकेने वस्त्रोद्योग व्यापारी सहकारी बँक लिमिटेड, उज्जैन नागरी सहकारी बँक लिमिटेड, पाणीहाटी सहकारी बँक, ब्रह्मपूर सहकारी अर्बन बँक, सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक, उत्तर प्रदेश सहकारी बँक लिमिटेड आणि उत्तरपाडा सहकारी बँक यांना मोठा दंड ठोठावला. (Bank of Maharashtra customer care)
बँक ऑफ महाराष्ट्रवर किती दंड ठोठावण्यात आला?
रिझर्व्ह बँकेने जम्मू-काश्मीर बँकेवर अडीच कोटी रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रवर १.४५ कोटी रुपये आणि अॅक्सिस बँकेवर ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २८ लाख रुपये, टेक्स्टाइल ट्रेडर्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर ४.५० लाख रुपये, पाणीहाटी को-ऑपरेटिव्ह बँक आणि उत्तरपाडा को-ऑपरेटिव्ह बँकेवर २.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेला १ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. उज्जैन नागरी सहकारी बँक आणि ब्रह्मपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Bank of Maharashtra Near Me)
बँक ऑफ महाराष्ट्र
रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्रवर ‘कर्ज आणि ऍडव्हान्स – वैधानिक आणि इतर निर्बंध’ आणि ‘एटीएममधील मॅन इन द मिडल (एमआयटीएम) सल्लागार यासंबंधी जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल या सरकारी मालकीच्या बँकेला १.४५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Bank of Maharashtra Balance Check)
बँकेच्या खातेदारांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांवर काय परिणाम होणार, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत होता. आरबीआयने बँकांवर लावलेल्या दंडाचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही. ग्राहक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. त्यांच्या ठेवी बँकांमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांच्या व्यवहारांवर किंवा करारावर किंवा कर्जावर कोणताही परिणाम होणार नाही. नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बँकांना हा दंड ठोठावण्यात आला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Bank of Maharashtra under action from RBI including other banks check details on 23 July 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं