बदल पहिलीपासूनच, गणिताच्या पुस्तकामध्ये सोपे ते स्वीकारले

मुंबई : इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवर यावरून मोठं मोठे विनोद होण्यास सुरुवात झाली आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला अत्यंत मारक असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दरम्यान संबंधित बदल करताना इंग्रजी भाषेचे अनुकरण केल्याचा थेट आरोप केला जात आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण होईल, असा दावा देखील अनेकांनी केला आहे. मात्र बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संपुर्ण वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा बदल नवीन नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
मागीलवर्षी पहिलीपासूनच सुरूवात केली आहे. इंग्रजी व ४ दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील संख्या वाचन असे केले जाते. मात्र हे त्यांचे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव प्रामाणिक उद्देश त्यामागे आहे. केवळ २१ ते ९९ पर्यंतच हा बदल असून इतर जोडाक्षरे बदलण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाही, असेही नारळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं