Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर | सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर | महाराष्ट्रनामा – मराठी
30 April 2025 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर

Aditya Thackeray, Aaditya Thackeray, Devendra Fadnvis, Deputy Chief Minister

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील. तसेच त्यांना सरकारमध्ये पहायलाही आवडेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील असं ही ते म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वीच आणि प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीनंतर लगेचच आदित्य ठाकरे यांच्या नावाने ‘टॅग लाईन’ असलेले अनेक राजकीय कॅम्पेन सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेतील प्रत्यक्ष जमिनीवर लढून आणि लोकांमधून निवडून येणाऱ्या आमदार आणि खासदारांना अंधारात ठवून, पक्षात शॉर्टकटने राज्यसभेवर खासदार बनून जाणाऱ्या नेत्यांच्या तोंडून ‘आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे’ असे राजकीय कॅम्पेन सुरु झाले आहेत आणि त्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील हालचाली जोरदार सुरु असून, पक्षातील अनेक वर्ष त्याच पदाची अपेक्षा बाळगणारे नेते आता वेटिंगवर गेले आहेत आणि याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणजे काल आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः मंत्री एकनाथ शिंदे तब्बल २५ आमदारांच्या ताफ्याने आले आणि आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र त्यात एक अप्रत्यक्ष संदेश देखील होता, जो भविष्यात उफाळून येऊ शकतो. मात्र पक्षात सुरुवातीपासून मैदानावर काहीच मेहनत केलेली नसताना, केवळ पुत्र प्रेमापोटी भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करून ‘युवासेना’ स्थापन करून त्याचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेत २०-२५ वर्ष पक्षासाठी झगडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील नेते पद मिळालेले नसताना, आज आदित्य ठाकरे यांना थेट नेतेपद बहाल करून शिवसनेतील वरिष्ठ नेत्यांच्या रांगेत विराजमान करण्यात आले आहे आणि सध्या थेट मुख्यमंत्री पदासाठी ‘आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे’ असे राजकीय कॅम्पेन सुरु झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान नेतृत्वाने जी राजकीय चाल कधीकाळी राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्याविरुद्ध वापरली होती, ती आज शिवसेनेतील सर्वच वरिष्ठ नेत्यांविरुद्ध कधी अमलात आणली गेली याचा सुगावा त्यांना देखील लागलेला नाही, असंच म्हणावं लागेल.

भाजप-शिवसेना युती होणारच!

आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती होणारच हे स्पष्ट आहे. आम्ही मोठा पक्ष असलो तरी मित्रपक्षाला बाजूला सारायचे ही आमची नीती नाही. आम्ही समान जागांवर लढणार आहोत. या जागा १३० ते १४० इतक्या असतील. उर्वरित जागा आम्हाला मित्रपक्षांनाही द्यायच्या आहेत. या पुढील निवणूक आम्ही केवळ विकास याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही राज्यातल्या जनतेला चांगले सरकार दिले असून आमच्यावर विश्वास ठेवावा असे जनतेला वाटत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

‘आता लावलाय हाऊसफुल्लचा बोर्ड’

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘भाजपमधील इतर पक्षांमधील नेत्यांच्या प्रवेशाला महा भरती असे म्हणणे योग्य नाही. आणि आता तर आम्ही आमच्या दरवाज्यांपुढे हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे. मात्र असे असले तरी देखील काही व्हीआयपी नेत्यांना आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत. मात्र हे नेते स्वच्छ चारित्र्यांचे असायला हवेत. तसेच त्यांनी जनतेची कामे केलेली असली पाहिजेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मोठ्या नेत्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे’.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

x