सत्तेसाठी विरोधी पक्ष फोडून केलेली मेगाभरती भाजपाला आज चुकीची वाटतेय: सचिन सावंत

मुंबई: विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.
सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यासाठी ‘साम,दाम,दंड,भेद वापरून सत्तेसाठी मेगाभरती केली होती. परंतु, आता त्याच भारतीय जनता पक्षाला मेगा भरती ही चूक असल्याचे वाटत असल्याचा टोला सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. तसेच, गुंड व भ्रष्टाचारी लोकांना जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाने ‘आतातरी सुधरावे’ असा सल्ला सुद्धा यावेळी सावंत यांनी दिला. तर भारतीय जनता पक्षात गेलेले ‘घरके न घाट के’ झाले असून काँग्रेसचे मात्र त्यामुळे शुध्दीकरण झाले असल्याचा टोला त्यांनी गयारामांना लगावला.
विरोधी पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून सत्तेकरीता केलेली मेगाभरती आता @BJP4Maharashtra ला चुकीची वाटतेय. गुंड व भ्रष्टाचारीही जमा केल्याने अत्यंत हीन पातळीवर गेलेल्या भाजपाला GET WELL SOON हा सल्ला आहे. भाजपात गेलेले घरके न घाट के झाले पण काँग्रेसचे शुध्दीकरण मात्र झाले!
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 18, 2020
भाजपमध्ये आयत्यावेळी प्रवेश केलेल्या नेत्यांची निकालानंतरच्या घडामोडींमुळे मोठी राजकीय कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना २०२४च्या अनुषंगाने मतदारसंघात स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवायचे असल्यास राज्यात सत्तेत येणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेनेच्या आश्रयाला जावे लागेल अशी राजकीय अडचण निर्माण झाली आहे.
पंचायत समितीत देखील महाविकास आघाडीने भाजपाला धक्के दिल्याने स्थानिक पातळीवर स्वतःच राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी पक्षांमध्ये जाणं सोयीचं समजत आहेत. भाजपातील किमान १७ विद्यमान आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे कमित कमी पक्षातील निष्ठावंत तरी कसे जपता येतील यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे वक्तव्य केल्याचं म्हटलं जातं आहे. तसेच आयतांना पक्षात प्राधान्य देऊन मेगा भरती करणाऱ्या फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरुद्ध भाजपातील निष्ठावंतांचा रोष वाढू नये याची काळजी घेण्यास राज्य भाजप सरसावल्याचं म्हटलं जातं आहे आणि त्यामुळे भाजपात लवकरच नेत्यांचे महविकास आघाडीत प्रवेश करणं सुरु होणार असल्याचं वृत्त आहे.
Web Title: Congress spokesperson Sachin Sawant criticizes BJP over Megabharti issue.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं