कुठल्या काळात? मुंबई पोलिसांना गरज 'त्या' अत्याधुनिक घोड्यांची; सरकारने दिले 'हे' घोडे

मुंबई: आज मुंबई पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या हत्यारांचा आढावा घेतल्यास गुन्हेगार, गँगस्टर आणि दहशतवाद्यांकडे देखील अत्याधुनिक हत्यारं असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जर पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र असती तर वेळीच दहशतवाद्यांना रोखता आलं असतं असा निष्कर्ष देखील समोर आला होता. आज पोलिसांच्या तुलनेत दहशतवादी आणि गुन्हेगार आधुनिक झाले आहेत हे सत्य आहे. राज्य सरकारने देखील पोलिस दलाच्या अत्याधुनिकीकरणासाठी भरीव निधी देण्याची गरज आहे. मात्र तसं होताना दिसत नाही.
पोलिसांना सामान्य लोकांच्या आणि शहराच्या रक्षणासाठी अत्याधुनिक घोड्यांची (हत्यारं) गरज असताना राज्य सरकारने त्यांना अश्व म्हणजे घोडे देण्याचा निर्णय घेतला आहे. चांगल्या देखभालीची सोय नसल्याने मरोळ एलए विभागात पेट्रोलवर चालणारे चार पायांचे घोडे म्हणजे वाहन धूळ खात सडून गेली आहेत आणि त्यात सरकारने हे घोडे देऊन पोलिसांचा केवळ व्याप वाढविण्याचं काम केलं आहे अशी चर्चा रंगली आहे.
इतर विकसित देशात देखील अश्व स्कॉड आहेत, मात्र ते जुनी औपचारिकता म्हणून जसे भारतात राष्ट्रपती भवनात आहे. मात्र त्या विकसित देशात पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र देण्यात सरकारने कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. आधीच आधुनिक हत्यारं नाहीत आणि त्यात असलेली हत्यारं देखील गरजेच्या वेळी चालविण्याची मान्यता नाही. त्यात दिवसेंदिवस शहरातील आंदोलनं आणि मोर्चे हिंसक होत चाललेली आहेत जेथे पेट्रोल बॉम्ब आणि जाळपोळ सहज केली जाते. अशावेळी मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी अश्वदलावर सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्या प्राण्यांचा जीव देखील वेठीस लावला जाणार आहे. त्यामुळे यावर विरोधकांनी देखील खोचक टीका केली आहे.
जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं “उद्धवा अजब तुझे सरकार” pic.twitter.com/MhOnra2x6t
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2020
मुंबई पोलीस दलात येत्या २६ जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली होती. ब्रिटिश काळात मर्यादित लोकसंख्या असताना त्यांच्या जिवीत व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी अश्वदलावर होती. पुन्हा एकदा शहरात ३० अश्व आणि त्यावर स्वार वर्दीधारी सिमेंटच्या रस्त्यावर दौड करताना दिसणार आहेत. एकेकाळी मुंबईची शान राहिलेल्या अश्वदलाचा तब्बल ८८ वर्षाच्या खंडानंतर पुन्हा त्यांच्या नाळेचा आवाज खडखडणार आहे.
सशस्त्र विभागाच्या (एलए)च्या अखत्यारित अश्वदलाची जबाबदारी राहणार आहे. मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे. पोलिसांच्या अश्वदलामध्ये ३० घोडे असणार असून प्रत्येकी एक फौजदार व सहाय्यक फौजदार असतील. तर ४ हवालदार व ३२ कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. फौजदाराकडून या दलाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.
Web Title: Mumbai Police need advanced weapons to protect city.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं