भारत हा हिंदू देश नाही; राजनाथ सिंह आणि मोहन भागवतांमध्ये दुमत? संघ कोपणार?

नवी दिल्ली: संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले.
#WATCH Defence Min Rajnath Singh:…If any Muslim brother from Pakistan wants to come to India&stay here,then we have a provision in our citizenship act to give them Indian citizenship.We gave citizenship to 600 Pakistanis in last 5-6 yrs.Still attempts are made to stoke violence pic.twitter.com/v4K11fJQYE
— ANI (@ANI) January 30, 2020
एकीकडे देशभर सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे रान पेटलेलं असताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. एका बाजूला दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे हिंदू-मुस्लिम असा चालवला आहे आणि त्यात पाकिस्तान आणि देशद्रोह यांचा वारंवार भाषणात उच्चार केला जातं असल्याचं दिसतं.
पाकिस्तान सारख्या देशात नाकारलेले आणि त्यांच्या अत्याचारांचे बळी गेलेल्या हिंदूंना भारतात नागरिकत्व देण्यावरून अजून रणकंदन पेटलेलं असताना, भारतातील मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून स्वतःला असुरक्षित असल्याचं सांगत आहे. त्यात पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मूळच्या पाकिस्तानी मुस्लिमांना भारत सरकार’मधील मंत्री थेट भारतात नागरिकत्व देण्याची भाषा करत असल्याने समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
पुढे राजनाथ सिंह असे म्हणाले की, ‘भारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही. पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लीम लोकांवर धार्मिक अत्याचार होतात, म्हणून आम्हाला हा कायदा करण्याची आवश्यकता होती. मग ते हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी असतील, तिथे त्यांच्यावर धार्मिक अत्याचार केले जात आहे आणि भारतात त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची इच्छा आहे. मग आपण त्यांना नागरिकत्व देऊ. या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
तत्पूर्वी, नोव्हेंबर २०१९ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोणत्याही एका विचारधारेत बांधलं जाऊ शकत नाही. भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही, असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं. ‘द आरएसएस : रोडमॅप फॉर ट्वेंटीफर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सदर पुस्तक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील आंबेकर यांनी लिहिलं आहे.
“संघाची विचारसरणी म्हणून काहीही बोलणं किंवा एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं चुकीचं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीही आपल्याला संघ पूर्णपणे समजला आहे, असं कधीही म्हटलं नाही. इतके दिवस सरसंघचालक राहिल्यानंतर गुरुजी म्हणाले की मला कदाचित संघ समजण्यास सुरुवात झाली असेल,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.
Web Title: India is not Hindu nation but it is a Secular nation says Defence Minister Rajnath Singh.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं