'RTI' मार्फत प्रश्न विचारला, १५ लाख कधी मिळणार ? काय उत्तर मिळालं असेल ?

नवी दिल्ली : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान त्यांच्या एका भाषणात काळ्या पैशांबाबत बोलताना अप्रत्यक्ष रित्या मतदाराला एक आमिष दाखवलं होतं. त्याचा सामान्यांवर मोठा प्रभाव पडून मतदान सुद्धा झालं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलेलं कि, प्रत्येक नागरिकांच्या बॅंक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. त्याचाच संदर्भ घेऊन मोहन कुमार शर्मा यांनी नोटबंदीच्या घोषणेच्या १८ दिवसांनंतर म्हणजे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआय अंतर्गत १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. परंतु नरेंद्र मोदींच्या घोषणेबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात येत नाही, त्यामुळे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही असं उत्तर पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलं आहे.
तसेच नेमके कोणत्या तारखेला १५ लाख रुपये भारतातील नागरिकांच्या बॅंक खात्यात जमा होणार याबाबत मोहन कुमार शर्मा यांच्याकडून माहिती अधिकाराद्वारे विचारणा करण्यात आली होती. इतकच नव्हे तर पंतप्रधान कार्यालय आणि आरबीआयने तपशीलवार माहिती दिली नाही अशी तक्रार सुद्धा मोहन कुमार शर्मा यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे प्रमुख आर.के. माथुर यांच्याकडे केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं