सेना-भाजप 50-50, विधानपरिषद निवडणुकीसाठी मनो-मिलन झालं

मुंबई : जनतेला खुश करण्यासाठी एकमेकांना स्वतंत्र निवडणुका लढण्याचा इशारा देणारे निवडणूक येताच ५०-५० फॉर्म्युला निश्चित करत पुन्हां एकत्र आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा निवडणुकीसाठी सध्या विचारविनिमय सुरु आहे.
२०१४ पासूनच शिवसेना आणि भाजपचं हे राजकारण महाराष्ट्रासाठी नित्याचेच झाले आहे. निवडणूक लागल्या की लगेच ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना’ असच काहीस शिवसेना आणि भाजपचं सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपच एकमत झाले असून उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० फॉर्म्युला निश्चित झाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं