Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
shiv sena and bjp will advantage maharashtra election but can not ignore MNS in 2019 | राज्यात युती झाल्यास शिवसेनेला मोठं नुकसान | महाराष्ट्रनामा – मराठी
5 May 2025 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

राज्यात युती झाल्यास शिवसेनेला मोठं नुकसान

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर भाजपला फायदा होऊन सेनेच्या मतांच्या टक्केवारीत प्रचंड घट होऊ शकते असा अंदाज सर्व्हेमधून वर्तविण्यात आला असून सेनेच्या मतांची गतवेळची टक्केवारी २४ वरून थेट १९ टक्क्यांवर म्हणजे ५ टक्क्यांनी घसरू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर भाजपला फायदा होताना दिसत आहे.

तर दुसरीकडे भाजपच्या मतांची टक्केवारी २ ने वाढून त्यांना २९ टक्के मत मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आघाडी आणि युतीमध्ये सर्वाधिक मतं युतीलाच मिळतील. युतीला एकूण ४८ टक्के मतं मिळतील तर आघाडीला ४० टक्के मत पडतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

त्याचा अर्थ आघाडी आणि युती मध्ये सर्वाधिक टक्केवारी ही युतीची असेल. एबीपी न्यूज-सीएसडीएस व लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेतील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यास काय स्थिती असू शकते ते अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

हे झाले सर्व्हेमधील अंदाज पण एकूणच राज्यातली वस्तुस्थिती बघितल्यास भाजप आणि शिवसेनेमधला दुरावा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवसेनेने जरी स्वतंत्र निवडणुका लढविण्याची घोषणा केली तरी शेवटच्या क्षणी काय चित्र पालटेल हे सांगता येत नाही. तर दुसऱ्याबाजूला असं सुद्धा होऊ शकत जे २०१४ मध्ये झालं होतं. दोन्ही पक्ष निवडणुका स्वतंत्र लढवून एकमेकांवर प्रचारात चिखलफेक करतील. त्यामुळे माध्यमांचं लक्ष या दोन्ही पक्षांच्या प्रचारावर केंद्रित होईल आणि इतर महत्वाचे विषय मागे पडून याच दोन्ही पक्षांवर सर्वांचं लक्ष केंद्रित होईल.

आम्ही स्वतंत्र लढतो आहोत असं दाखवून निवडणुकीच्या निकालानंतर भाजप व शिवसेना पुन्हा एकत्र येतील जसे २०१४ मध्ये आले होते. तरी एकूणच पुढे काय होत ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. तरी २०१४ प्रमाणे भाजप आणि शिवसेनेने वेगळे लढून राजकारण केलं तर ते त्यांच्या अंगलट सुद्धा येऊ शकत. कारण मोदींच्या सत्ताकाळात त्यांच्यावर नाराज असलेला मोठा मराठी मतदार सेनेला मतदान करण्यापेक्षा मनसेवर विश्वास ठेवणे पसंत करेल. त्याला कारण म्हणजे २०१४ प्रमाणे शिवसेना निवडणुकीनंतर पुन्हां भाजप सोबत जाऊ शकते ही भीती त्याच्या मनात असेल.

तसेच शिवसेनेचा ४-५ वर्षातील विकास शून्य कारभार पाहता मराठी मतदार पुन्हां सेनेला मतदान करण्यापेक्षा मनसेला मत देणं पसंत करतील. तो मतदार विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक आणि कोंकण मधला मराठी मतदार असेल. तसेच मनसेचा मूळ मतदार जो २०१४ मध्ये सेनेकडे वळला होता, तो पुन्हा मनसेकडे वळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

x