आज शेतकरी पराभूत झाला तर भविष्यात या तानाशाही सत्तेपुढे कोणीही आवाज उठवणार नाही

नवी दिल्ली, २९ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारीला हिंसक वळण लागलं आणि विषय सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्रातील मोदी सरकारने प्रशासकीय पातळीवर संपूर्ण आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी आंदोलक असलेल्या ठिकाणी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना मॅनेज करून स्थानिकांचा शेतकऱ्यांना विरोध असल्याचं भासविण्यात आलं. वास्तविक हीच स्थानिक लोकं मागील दोन महिने शेतकऱ्यांना पाणी आणि खाण्यापिण्याची सोय करत होते.
शेतकरी नेत्यांवर FIR करून त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याची देखील रणनीती आखण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी पोलिसांना थेट राकेश टिकैत यांच्याकडे पाठवून आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेश टिकैत यांनी केलेल्या भावुक भाषणानंतर संपूर्ण वातावरण पुन्हा पलटू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकूण मोदी सरकारची दडपशाही पाहता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सामान्य लोकांनाच भविष्याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
याबतात ट्विट करताना राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे की, “जर आज शेतकरी पराभूत झाला तर भविष्यात या तानशाही सरकारपुढे आवाज उठविण्याची कोणीही हिम्मत करणार नाही…किसान जिंदाबाद
रात्री उशिरा पोलिसांनी टिकेत यांना समजवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला. माध्यमांशी संवाद साधताना टिकेत यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांसोबत विश्वासघात झाला आहे. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर आंदोलनस्थळावरील परिस्थिती बदलली. राकेश टिकेत यांचे बंधू नरेश टिकेत यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा मुझफ्फरपूरमध्ये केली.
त्यानंतर नरेश टिकेत यांनी महापंचायतीची घोषणा केली. रातोरात पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली. सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला. सध्याच्या घडीला राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. गेल्या काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.
News English Summary: If the farmer loses today, no one will be able to dare to raise his voice against such a dictatorial government in the future. Kisan Zindabad said farmers leader Rakesh Tikait.
News English Title: Farmers leader Rakesh Tikait criticised Modi government behaviour with protesting farmers news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं