भाजप-सेनेच्या राजवटीतली महागाई थांबता थांबेना, सामान्य हैराण

मुंबई : सर्वच शहरांमध्ये रोजच्या जीवनाश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले असून त्यात भाजीपाल्यासारख्या वस्तू महागण्याची शक्यता. आधीच कालपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपानंतर आता संपूर्ण देशातील शेतकरी संपावर गेल्याने दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे.
मुंबईच्या दादर मंडईमध्ये केवळ निम्म्याच शेतमालाच्या गाड्या शनिवारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी भाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा संप असाच १० दिवस सुरु राहिल्यास महागाईचा भस्मासुर उभा राहील. शेतकरी संपावर सरकारला तोडगा काढण्यात यश येत नसल्याने भाजी व्यापारी सुद्धा धास्तावले आहेत.
महागाई केवळ भाजी पाल्यापुरतीच मर्यादित नसून पेट्रोल, डिझेल, गॅस आणि रोजच लागणार दूध सुद्धा महागल्याने सामान्यांचे महागाईने चांगलेच कंबरडे मोडले आहे. आम्ही महागाई कमी करू अशा फुशारक्या मारत सत्तेत आलेलं भाजप शिवसेनेचं सरकार महागाई रोखण्यात अक्षरशा नापास झाल्याचं चित्र आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं