आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून १४ पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ

नवी दिल्ली : आगामी निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करण्यात आली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि नापिकी सारख्या अनेक प्रश्नांनी होरपळलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे.
दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर विचार करून अखेर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. धानाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये २०० रुपयांनी वाढ करून ती १८०० रुपये प्रति क्विंटल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी, म्हणजे मागील १० वर्षांपासून हा यात वाढ करण्यात आली नव्हती. २००८-०९ या आर्थिक वर्षात तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने १५५ रुपये इतकी वाढ केली होती.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर ३३, ५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे समजते. सरकारकडून वाढविण्यात आलेल्या एमएसपीचे मूल्य जी.डी.पी’च्या ०.२ टक्के इतका आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं