पाकिस्तानचे ‘सार्क’ परिषदेचे निमंत्रण भारताने फेटाळले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये डेरा बाबा नानक-करतारपूर साहिब कॉरिडॉरवरुन सुरू असलेल्या वादादरम्यान पाकिस्तानला आणखी एक दणका मिळाला आहे. दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, मोदी सरकारने पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण नाकारले असल्याचे वृत्त आहे.
२०१६ मध्ये भारतीय लष्कराच्या उरीमधील तळावर पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. अशा पार्श्वभूमीवर सार्कच्या परिषदेत भाग घेण्यास भारतासह इतर सर्व सदस्य देशांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून पूर्णता ठप्प झालेली सार्क संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी राजधानी इस्लामाबादमधील सार्क परिषदेचे निमंत्रण काल भारताला देण्यात आले होते. परंतु, पाकिस्तान सरकारचे हे निमंत्रण आज भारताने फेटाळत इतर ७ देशांना न विचारता सार्क समिट भरवणारा आणि निमंत्रण देणारा पाकिस्तान कोण? असा सवाल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं