जवानांना स्वतःच्या खिशातून गणवेश व इतर साहित्य घ्यावे लागणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या अतिरिक्त निधीसाठी नकार दिल्याने लष्कराला त्यांच्या अनेक खर्चात कपात करावी लागणार असून अगदी गणवेश आणि इतर साहित्य सुद्धा जवानांना स्वखर्चातून घ्यावं लागणार आहे. परंतु यावरून केंद्र सरकारची उदासीनता समोर आली आहे.
केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी न मिळाल्यामुळे भारतीय लष्कराने ऑर्डिन्स शस्त्र फॅक्टरीतून होणाऱ्या एकूणच खरेदीला चाप लावला आहे. देशावर एखादे छोटे युद्ध करण्याची परिस्थिती ओढवल्यास त्या आपत्कालीन परिस्थितीत दारुगोळा घेण्यासाठी भारतीय लष्कराला या पैशांचा सदुपयोग करता येणार आहे.
एकूणच भारतीय लष्कराला पुरवल्या जाणाऱ्या साहित्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवरून थेट ५० टक्क्यांपर्यंत आले आहे. तसेच या अतिरिक्त निधीत झालेल्या कपातीमुळे लष्कराच्या वाहनांच्या सुट्या भागांच्या खरेदीवर सुद्धा परिणाम होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं