राज्य सरकार पलटलं, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम

मुंबई : नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात निवेदन देऊन मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याचं मान्य करणारऱ्या राज्य सरकारने काही दिवसातच सुरक्षेच कारण पुढे करत स्वतःचाच निर्णय फिरवला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विधिमंडळात दिली जाणाऱ्या निवेदनांवर सामान्यांनी किती विश्वास करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यात एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सिनेमागृहात खाद्यपदार्थ चढ्या दारात विकल्याबद्दल कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस ऍक्टमध्ये रडतूड नसल्याचं कारण पुढे केलं आहे.
उच्च न्यायालयाने आधीच या विषयावर सरकारची खरडपट्टी काढलेली असताना सरकारचा हा निर्णय म्हणजे केवळ एक पळवाट असल्याचं अनेक जण बोलत आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्स मालकांचा उन्मत्तपणा आणि सामान्यांची लूट वाढण्याची शक्यता आहे. मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळे सरकारवर चांगलाच दबाव निर्माण झाला होता. परंतु सरकार सुरक्षेचं कारण पुढे करत मल्टिप्लेक्स मालकांची पाठराखण तर करत नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं