सकाळचा नाश्ता आहे सर्वात महत्वाचा आणि तो न केल्याने होणारे आरोग्यास होणारे तोटे जाणून घ्या

दिवसभराच्या आहाराच्या तुलनेत सकाळचा नाश्ता महत्त्वाचा असतो. ब्रेकफास्ट चुकवल्याने याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अनेक अभ्यासादरम्यान ही बाब समोर आली आहे. काहीजण सकाळी ब्रेकफास्ट करत नाही मात्र, यामुळे आरोग्यास खूप तोटे होतात. यामुळे अनेक आजारही होऊ शकतात.
सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. असं सांगितलं जात की, सकाळचा नाश्ता हा नेहमी राजासारखा करावा. यामागचे कारण म्हणजे झोपून उठल्यानंतर म्हणजेच साधारण सात ते आठ तास आपल्या पोटात कोणत्याही प्रकारचे अन्न खाल्ले जात नाही. त्यामुळे सात ते आठ तासांच्या कालावधीनंतर पोटाला अन्नाची गरज भासते. ही गरज नाश्त्यातून पूर्ण केली गेली पाहिजे.
आरोग्यदायी आणि सुदृढ शरीरासाठी हा ब्रेकफास्ट म्हणजे जणू एका अविरत चालणाऱ्य़ा इंजिनमध्ये टाकलं जाणारं तितकंच चांगलं इंधन. ज्यामुळं हे शरीररुपी इंजिन अगदी सुरळीत चालतं. ब्रेकफास्ट करण्याचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातही काही पोषक पदार्थांचं सेवन केल्यास त्यामाध्यमातून शरीरासाठीची आवश्यक उर्जा सात्तत्यानं पुरवली जाते. धान्य, पोहे, इडली, दलिया, अंड अशा पदार्थांचा समावेश असल्यामुळं हा परिपूर्ण आहार ठरतो. त्यामुळं ब्रेकफास्ट कधीही टाळू नका असाच सल्ला कायम देण्यात येतो. ब्रेकफास्ट टाळल्यामुळं त्याचे थेट परिमाम शरीरावर होतात. चला जाणून घेऊया, काय आहेत ते परिणाम…
ब्रेकफास्ट न केल्याने होतात हे तोटे
डायबिटीज : ब्रेकफास्ट न केल्याने डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. हॉवर्ड युनिर्व्हसिटीच्या एका स्टडी रिपोर्टनुसार, ज्या महिला ब्रेकफास्ट करत नाही त्यांना टाईप-२ डायबिटीज होण्याचा धोका २० टक्के अधिक असतो.
वजन वाढणे – सकाळचा ब्रेकफास्ट टाळल्याने वजन कमी होत असेल असा तुमचा समज असेल तर तुम्ही साफ चुकताय. अनेक संशोधनादरम्यान ही बाब समोर आली आहे की, दररोज ब्रेकफास्ट केल्याने वजन संतुलित राहते. याशिवाय जे लोक ब्रेकफास्ट करणे टाळतात ते लंच आणि डिनरमध्ये अधिक खातात. याचा परिणाम वजन वाढीवर होतो.
पचनक्रियेवर परिणाम – सकाळाच नाश्ता न केल्यास शरीरातील पचनक्रियेवर परिणाम होतो. दिवसभर कोणत्याही प्रकारचा आहार टाळल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो. दीर्घकाळ काही न खाल्ल्यास शरीरातून कॅलरी बर्न करण्याची क्षमता कमी होते.
भूक लागल्याने राग येणे – अधिक काळ उपाशी राहिल्याने अनेकांना राग येतो. एका अभ्यासातून ही बाब समोर आलीये की, जे पुरुष दररोज ब्रेकफास्ट करतात त्यांचा मूड ब्रेकफास्ट न करणाऱ्यांच्या तुलनेत चांगला असतो. याशिवाय ब्रेकफास्ट न केल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. चक्कर आण डोकेदुखीही सतावते.
मुखदुर्गंधी – ब्रेकफास्ट न केल्याने केवळ शरीरावरच परिणाम होत नाही यामुळे तुमची सोशल लाईफही प्रभावित होते. ब्रेकफास्ट न केल्याने तोंडात लाळ बनण्याचे प्रमाण कमी होते यामुळे जिभेवरील बॅक्टेरिया दूर होत नाही आणि मुखदुर्गंधीचा त्रास सतावतो.
News English Summary: Breakfast is a very important meal – it can either make or break your day. Missing breakfast has a big impact on health. This has come to the fore during several studies. Some people do not eat breakfast in the morning, however, it is very harmful to health. It can also cause many diseases.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं