Health First | क्षयरोग एक संक्रमित रोग | जाणून घ्या लक्षणे - नक्की वाचा

मुंबई, १५ ऑगस्ट | क्षयरोग हा एक संक्रमित रोग असून जगातील एक तृतीयांश लोकांना याची लागण होताना दिसून येते. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर क्षयरोगवाहक फुफुस्सात बंद होतात. या गोष्टीमुळे खोकला, रक्ताची थुंकी, ताप आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.
कधी कधी क्षयरोग हा मेंदू, मज्जा किंवा मूत्रपिंडात सुद्धा पसरते. हा एक निष्क्रिय आणि गुप्त रोग आहे, ज्याची क्वचित लक्षणे निर्माण होऊ शकतात. पल्मनरी टी. बी मध्ये दीर्घकालीन खोकला , रक्ताचे डाग फुटणे,श्वास घेण्यात अडचण, ताप,रात्री घाण येणे, वजन कमी होणे, थकवा, भूक न लागणे. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे नेणे अपेक्षित आहे. त्यावर उपचारासाठी विविध औषधे उपलब्ध आहे. या औषधांना जिवाणू मारतात ती औषधे आणि जिवाणूंची वाढ थांबवतात ती औषधे असे वर्गीकरण केले आहे. औषधोपचार, डोस आणि उपचारांचा कालावधी निवडल्यास संसर्गाचा प्रकार आणि संक्रमणाची तीव्रता निश्चित केला जातो. लेटेस्ट इन्फेकशन हे एकच औषध वापर जाते, जे सहा महिने घेतात.
क्षयरोगाचे उपचा पद्धत दीर्घकाळ चालू राहत असल्याने त्याचे काही परिणाम सुद्धा दिसून येतात जसे की सतत मळमळ, त्वचा पिवळसर पडणे, भूक न लागणे, सतत ताप इत्यादी. हा आजार दीर्घकाळ चालू असल्याने कधीतरी मानसिक सल्ल्याची देखील गरज भासू शकते कारण या दरम्यान ताण,चिंता,निराशा अशा गोष्टी घडू शकतात. हा आजार असणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे. नियमित तपासण्या करणे आणि संतुलित आहार ठेवणे गरजेचे आहे .
भारतात टीबीची स्थिती:
जागतिक आरोग्य संघटना, अर्थात WHOच्या अहवालानुसार क्षयरोग हे जगात मृत्यूच्या दहा कारणांपैकी एक आहे. तसंच एकाच जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये टीबीनं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. WHO नं 2018 साली जाहीर केलेल्या अहवालानुसार, वर्षभरात जगात सुमारे एक कोटी 40 लाख लोकांना टीबीची लागण होते, त्यातले 20 लाख लोक भारतात आहे. तसंच टीबीनं होणाऱ्या जगभरातल्या 15 लाख मृत्यूंपैकी सुमारे वीस टक्क्यांहून अधिक मृत्यू हे भारतात होतात.
भारत सरकारच्या अहवालानुसार (RNTCP report) देशात गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 4 लाख 20 हजार, तर महाराष्ट्रात सुमारे 2 लाख 9 हजार रुग्ण आढळून आले. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 2017-18 साली शहरात आढळून आलेल्या क्षयरोगग्रस्तांची संख्या 46 हजारांहून अधिक होती. देशात ड्रग रेझिस्टंट म्हणजे औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगानं ग्रस्त रुग्णांचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Health Title: Tuberculosis symptoms in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं