Loksabha 2024 | 3 दिवसांपूर्वी मोदींची स्तुती करणारे मुख्यमंत्री नवीन पटनायक अचानक पलटले, नीती आयोगाच्या बैठकीपासून स्वत:ला दूर का ठेवले?

Loksabha 2024 | ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरी येथून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते आणि पुरी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, शनिवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या महत्त्वपूर्ण बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. त्याच्या या आकस्मित निर्णयाने भाजपाला धक्का बसला आहे.
नवीन पटनायक नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार होते, पण त्यांनी शेवटच्या क्षणी आपले वेळापत्रक बदलले. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत बीजेडीने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेचा आढावा सध्या ते घेत आहेत असं वृत्त आहे. नवीन पटनायक यांनी 29 मे 2019 रोजी पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
नवीन पटनायक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या बैठकीला उपस्थित नव्हते.
नीती आयोगाच्या बैठकीला मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अनुपस्थितीवर बीजेडी नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तळागाळातील राजकारणी म्हणून नवीन पटनायक यांनी टीव्ही, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर भाजप आणि मोदी यांच्याशी वाढत्या जवळीकमुळे अजून फार मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी झालेले नाहीत असं राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. मात्र महागाई आणि बेरोजगारीमुळे देशातील एकूण राजकीय वातावरण भाजपचया विरोधात असल्याचे संकेत आता सर्वच राज्यातील स्थानिक नेत्यांना दिसू लागले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला गैरहजर राहण्यापेक्षा संदेश देण्याचा चांगला मार्ग कोणता असू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
२००० रुपयांच्या नोटांवरून ओडिशातील जनतेत प्रचंड नाराजी
माजी अर्थमंत्री आणि बीजदचे ज्येष्ठ आमदार शशीभूषण बेहरा यांनी केंद्र सरकारच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या आदेशावर केलेली टीका हे बीजेडी समान राजकारण करण्यात पारंगत असल्याचे द्योतक आहे, असे एका राजकीय विश्लेषणातून समोर आले आहे. असे निर्णय घेऊन मोदी सरकार आर्थिक अस्थिरता निर्माण करत आहे, असा आरोप बेहरा यांनी केला होता. राजकीय विश्लेषक सत्य प्रकाश दास म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या हिरवा कंदीलशिवाय बेहरा यांनी २००० रुपयांच्या नोटांवरील निर्णयावर कधीही टीका केली नसती.
News Title: CM Naveen Patnaik absence in Niti Aayog meeting check details on 28 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं