Eknath Shinde Camp | राजकीय मित्र पक्षांना संपवणं हाच भाजपचा इतिहास, प्रथम ठाण्यातून शिंदेंचं अस्तित्व संपविण्याची भाजपाची तयारी?
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Eknath Shinde Camp
- भाजपकडून कल्याण बरोबर पालघर-ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा
- काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संघर्ष
- ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर काय म्हणाले?

Eknath Shinde Camp | सध्या भाजप-शिवसेनेतील नेते एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. राज्यातील जागावाटपाचा बाजूला पडून ठाण्यातीलच वाद शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीतील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
भाजपकडून कल्याण बरोबर पालघर-ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा
ठाणे स्थानिक पातळीवरील हा संघर्ष इतका वाढला असून, कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याचीच तयारी दर्शवली. दुसरीकडे भाजपकडून कल्याण बरोबर पालघर-ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा करण्यात आला असून, भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी थेट ऑन कॅमेरा तसं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय मित्र पक्षांना संपवणं हाच भाजपचा इतिहास असताना आता प्रथम ठाण्यातून शिंदेंचं अस्तित्व संपविण्याची भाजपाची तयारी सुरु झाली आहे असं म्हटलं जातंय.
काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये संघर्ष
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मुद्द्यावरून हा वाद पहिल्यांदाच बाहेर आला. या प्रकरणावरून भाजपने शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला आणि राजकीय संघर्ष आणखी वाढला.
खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाण्यातील भाजपचे आमदार, नेते, पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेविरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहे. आणि त्यामुळेच शिंदे पिता-पुत्रांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे सांगितलं जात आहे.
ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर काय म्हणाले?
भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसमोरच एक विधान केले. “2014 च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील अनेक लोक मोदी ट्रेनमध्येच बसून गेले. ते आपल्या पक्षाचे असो वा मित्रपक्षाचे असो. मोदींच्या नावाखाली ते निवडून आले आणि आता अनेक प्रकारचे दावे केले जातात. मला आश्चर्य वाटतं, कीव करावी वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यातून कुणीही निवडून जाऊ शकणार नाही, अशा प्रकारची ताकद भाजपमध्ये आहे. एवढे मोठे काम केले आहे. सेवेचे व्रत घेऊन काम केले आहे”, असे ते म्हणाले.
संपूर्ण ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचा होता. कल्याण असेल पालघर असेल आणि असेल, भारतीय जनता पार्टीचेच जिल्हे होते. कल्याण लोकसभा तर आहेच ठाणे देखील भारतीय जनता पक्षाचा आहे. असेल तर हात वर करा, कल्याण लोकसभा ही भारतीय जनता पक्षाचे आहे की नाही? रामभाऊ म्हाळगी, राम भाऊ कापसे, जगन्नाथ पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. या नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे, असंही ते म्हणाले.
News Title : Eknath Shinde Camp Thane Politics check details on 12 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं