Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी | Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी | महाराष्ट्रनामा – मराठी
28 April 2025 11:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी

Farmers Waived Off

Brand Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलेलं वचन पाळलं आहे. काँग्रेसची सत्ता आलेल्या एका राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन तेलंगणातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, दोन लाख रुपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेलंगणातील काँग्रेस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. यावेळी सीएम रेवंत रेड्डी म्हणाले की, 2018 ते 2023 दरम्यान 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना एकरकमी माफ केले जाईल.

राज्यातील शेतकऱ्यांनी १२ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०२३ या पाच वर्षांसाठी घेतलेले दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी दिली. पात्रतेच्या अटींसह कर्जमाफीचा तपशील लवकरच शासन आदेशात (जीओ) जाहीर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडणार
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे तेलंगणा सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 31,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मागील बीआरएस सरकारने एक लाख रुपयांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न करून शेतकरी आणि शेती अडचणीत आणली होती, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

काँग्रेसने पूर्ण केले कर्जमाफीचे आश्वासन
काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी 6 मे 2022 रोजी वारंगलमध्ये तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज राज्यातील काँग्रेस सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बीआरएसचा दारुण पराभव करून सत्ता मिळवली होती आणि ए. रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री केले होते. आता काँग्रेसप्रणीत राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे.

यापूर्वी काँग्रेस प्रणित झारखंड सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या लक्षात घेऊन कर्जमाफीची घोषणा केली होती. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सांगितले होते की, त्यांचे आघाडी सरकार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करेल. यामुळे मोफत विजेचा कोटा २०० युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी अनेक बँकांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. सीएम चंपई सोरेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2020 पर्यंत 50 हजार ते 2 लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज वन टाइम सेटलमेंटद्वारे माफ केले जाईल.

News Title : Farmers Waived Off in Telangana State check details 22 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmers Waived Off(1)

संबंधित बातम्या

x