Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Manipur Crisis | मणिपूर हिंसाचार, तीन महिने उलटून गेले तरी लोकं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं | Manipur Crisis | मणिपूर हिंसाचार, तीन महिने उलटून गेले तरी लोकं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं | महाराष्ट्रनामा – मराठी
2 May 2025 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

Manipur Crisis | मणिपूर हिंसाचार, तीन महिने उलटून गेले तरी लोकं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

Manipur Crisis

Manipur Crisis | मणिपूरमधील महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या घटनांवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कठोर भूमिका घेतली आहे. हिंसाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली समिती स्थापन करण्याबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआय आणि एसआयटीवर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागतील. आधीच बराच वेळ निघून गेला आहे. तीन महिने उलटून गेले तरी लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही.

ही अत्यंत भयानक घटना – सरन्यायाधीश

सरन्यायाधीशांनी हिंसाचार आणि लैंगिक छळाची प्रकरणे निर्भया प्रकरणापेक्षा ही गंभीर असल्याचे म्हटले आहे. ‘निर्भया प्रकरणासारखी ही परिस्थिती नाही, ज्यात सामूहिक बलात्कार झाला होता. ती भयानक घटना होती, परंतु ही घटना त्यापेक्षा भयानक आणि वेगळ प्रकरण आहे.

सुप्रीम कोर्टाला समिती स्थापन करावी लागणार?

आम्ही येथे कशा पद्धतीने हिंसाचार हाताळण्याबद्दल बोलत आहोत, ज्याला आयपीसीमध्ये स्वतंत्र गुन्हा मानले गेले आहे. त्यामुळे प्रशासनावर जनतेचा विश्वास दाखवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती स्थापन करावी लागणार आहे. यामध्ये कोणाशीही राजकीय संबंध नसलेल्या लोकांचा समावेश असेल. या समितीत काही न्यायाधीशांचा समावेश करण्यात येणार असून, त्यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश असणार आहे.

…. यावर आमचा हस्तक्षेप अवलंबून असेल – सुप्रीम कोर्ट

यावेळी त्यांनी केंद्र सरकारला हिंसाचारात विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी काय प्रयत्न केले, असा प्रश्न विचारला. त्यांची घरे बांधण्यासाठी किती पॅकेज देण्यात आले आहे? सरकारचे प्रयत्न किती आणि कसे झाले यावर आमचा हस्तक्षेप अवलंबून असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

घटना ४ मे रोजी घडली आणि गुन्हा १८ मे रोजी दाखल केला?

सरकारचे प्रयत्न मान्य असतील तर हस्तक्षेप करण्याची गरज भासणार नाही. यावेळी सरन्यायाधीशांनी ४ मे च्या घटनेसंदर्भात १८ मे रोजी गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल केला. इतके दिवस पोलीस काय करत होते? दोन महिलांना नग्न अवस्थेत नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी पोलीस काय करत होते? असा प्रश्न उपस्थित करून राज्य आणि मोदी सरकारला झापलं.

News Title : Manipur Crisis CJI DY Chandrachud check details on 31 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manipur Crisis(1)

संबंधित बातम्या

x