२६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत मोर्चा : आंबेडकर

मुंबई : पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार भडकावण्यामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेकरांनी केला होता. परंतु त्यापैकी संभाजी भिडे यांना अजून अटक झाली नसल्याच्या कारणाने प्रकाश आंबेडकरांनी हा इशारा दिला आहे.
मिलिंद एकबोटेंना अटक झाली असली तरी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना अजून अटक झालेली नसल्याने भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे की, २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक न झाल्यास मुंबईत कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे प्रचंड मोर्चा काढू असा थेट इशाराच प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
मिलिंद एकबोटे यांना आधीच १९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं