पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयच्या सूचनेवरुन जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्या?

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील ३ पोलिसांच्या क्रूर हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या आदेशावरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील ३ विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुराव्यानिशी उघड झालं आहे.
त्याआधारेच भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांची भेट घेणार होत्या. परंतु जम्मू-काश्मीरमधील ३ पोलिसांच्या क्रूर हत्येनंतर जे सबळ पुरावे समोर आले, त्यानंतर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. मेसेज इंटरसेप्ट करण्यात आल्यानंतरच सरकारकडून न्यूयॉर्कमधील भेट रद्द करण्यात आली. स्थानिक पोलिसांची हत्या करण्याचे आदेश सीमेपलीकडून म्हणजे पाकिस्तानातूनच देण्यात आल्याचा दावा भारतीय सुरक्षा दलांनी केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं