पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन

नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन सुरू असून Locवर गोळीबार सुरूच आहे. मात्र भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेने, चर्चेने प्रश्न परिस्थिती बदलू शकते असे म्हटले परंतु तरीही आज पहाटेपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे.
एकीकडे भारताला चर्चेचे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले आहे. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेसुमार उखळी तोफांचा मारा आणि गोळीबार केला. भारतीय लष्करानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा प्रकार जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटीत सकाळी ६ ते ७ असा सुमारे एक तास सुरू होता.
#JammuAndKashmir: Pakistan violated ceasefire at 6 am today in Krishna Ghati sector along the Line of Control in Poonch district. Indian Army retaliated effectively. Firing stopped around 7 am https://t.co/3VGaDZxHP5
— ANI (@ANI) February 28, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं