कृषी कायदे मागे घ्या | अन्यथा.... NDA'चे घटक पक्ष संतापले

नवी दिल्ली, १ डिसेंबर: कृषी कायद्यावरून (Agriculture Bills) सध्या देशभर वातावरण तापलं आहे. हरयाणा आणि पंजाबमधून होतं असलेला विरोध सध्या देशभर पसरू लागला असून मोदी सरकार देखील पेचात अडकलं आहे. लाखो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन दिल्ली गाठल्याने भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. केंद्राने चर्चेची तयारी दाखवली असली तरी त्यापूर्वी गुंता वाढताना दिसत आहे.
कृषी कायद्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा एका नव्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. शिरोमणी अकाली दलानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) काढता पाय घेतल्यानंतर आता आणखी एका पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) थेट धमकीवजा इशाराच दिला आहे.
आरएलपीचे संस्थापक आणि नागौरचे खासदार असणाऱ्या हनुमान बेनीवाल यांनी सोमवारी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करुन ट्विट केलं. यामध्ये त्यांनी, “अमित शाहजी, देशात सध्या सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता तिन्ही नवीन कायदे मागे घेण्यात यावेत. स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात. शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छेनुसार दिल्लीमध्ये चर्चेसाठी आमंत्रित करुन त्यांना योग्य तो मान द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं” असं म्हटलं आहे.
श्री @AmitShah जी किसान हित मे संज्ञान लेवे !@RLPINDIAorg @PMOIndia pic.twitter.com/0UeADvYjCv
— HANUMAN BENIWAL (@hanumanbeniwal) November 30, 2020
News English Summary: RLP founder and Nagaur MP Hanuman Beniwal on Monday tagged Union Home Minister Amit Shah in this regard. In it, he said, “Amit Shahaji, in view of the ongoing agitation in the country against the new agricultural laws, the three new laws should be withdrawn. All the recommendations of the Swaminathan Commission should be implemented. The farmers should be invited to Delhi for discussion as soon as they want and they should be given due respect and their views should be heard, ”he said.
News English Title: RLP threatens to quit NDA over farm bills writes to home minister Amit Shah News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं