आसाममधील भाजप सरकार संकटात; सहयोगी पक्षातील कार्यकर्त्यांना मारहाण महागात?

त्रिपुरा: भाजपचे आसाममधील सरकारची सत्ता धोक्यात आली आहे. कारण भाजपचा सहयोगी पक्ष आयपीएफटी’ने भाजपवर आरोप करताना थेट दुसरा पर्याय शोधण्याची धमकी देत एकप्रकारे सरकार अल्पमतात आणण्याची धमकी भाजपाला दिली आहे. विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आसाममध्ये आयपीएफटी’च्या कार्यकर्त्यांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा मानसिक छळ आणि त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आयपीएफटी’चे प्रवक्ते मंगल देबवर्मा यांनी जाहीर पत्रकार परिषद आयोजित करून भाजपाला सदर प्रकरणावरून गंभीर इशारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांनी संबंधित विषयाची माहिती देऊन देखील त्याची दाखल घेतली जात नसून, उलट हल्ल्यांचे प्रमाण अधिकच वाढल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून भाजप स्वतःच्या मित्र पक्षांच्या विरोधातच राजकारण खेळत असून ते जाणीवपूर्वक सहकारी पक्षांना संपवण्यासाठी कार्यकर्त्यांना लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, जर भाजपने या विषयाची गंभीर दखल घेतली नाही तर थेट पाठिंबा काढण्याची धमकी दिली असून, त्यांनी दुसरा पर्याय शोधण्याच्या पर्याय खुला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ सदर विषय कसा हाताळणार ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं