उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात सुषमा स्वराज आज गप्प का ?

नवी दिल्ली : उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणामुळे देशाची मान खाली आहे. संपूर्ण देशभर या घटनेचा निषेध होत असताना भाजपातील एक बड्या नेत्या सुषमा स्वराज यांची आज जनतेला आठवण झाली आहे. कारण २०१२ मध्ये निर्भया बलात्कार प्रकरणी संपूर्ण लोकसभा आपल्या भावना प्रदान भाषणाने हादरवून सोडणाऱ्या त्याच सुषमा स्वराज आज उन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत.
२०१२ मध्ये सुषमा स्वराज यांनी निर्भया बलात्कार प्रकरणी एक तडफदार भाषण केलं होतं. त्यात त्यांनी एका स्त्रीच्या तीव्र भावना लोकसभेत व्यक्त करत अपराध्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती ज्याला भाजपच्या खासदारांनी सुद्धा बेंच वाजवत सहमती दर्शविली होती. त्यावेळी निर्भया बलात्कार प्रकरणी सुषमा स्वराज यांनी जी भूमिका घेतली होती शंभर टक्के योग्यच होती यात काहीच वाद नाही.
परंतु जनतेला हाच प्रश्न पडला आहे की, २०१२ मध्ये काँग्रेसच्या राजवटी लोकसभा हलवून सोडणाऱ्या सुषमा स्वराज आज लोकसभेत गप्प का आहेत ? का सध्याच्या देशभर गाजणाऱ्या आणि संपूर्ण देशाला मान शरमेने खाली घालावयास लावणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाच्याच आमदाराचं नाव अडकल्यामुळे त्या गप्प आहेत असा प्रश्न सामान्य जनता विचारात आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणी सुषमा स्वराज यांच्या त्याच भाषणाची आम्ही सर्वांना आठवण करून देत आहोत,
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं