Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर नष्ट होऊ शकते: शास्त्रज्ञांचा इशारा | समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर नष्ट होऊ शकते: शास्त्रज्ञांचा इशारा | महाराष्ट्रनामा – मराठी
1 May 2025 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर नष्ट होऊ शकते: शास्त्रज्ञांचा इशारा

Mumbai City, Rising seas, Mumbai at Risk till 2050

नवी दिल्ली: समुद्रातील पाण्याचा स्तर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याचा स्तर सतत वाढत असल्यामुळं २०५० पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याचा स्तर वाढल्यामुळं जगभरातील १५ कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. या १५ कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे.

या रिचर्सनुसार समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर पूर्णपणे नष्ट होऊ शकते, असा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. या रिचर्समध्ये शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमधून आलेल्या फोटोंवरून हा निकष काढला आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, सॅटेलाइटच्या मदतीनं समुद्रातील पाण्याच्या स्तराची गणना करण्यात आली आहे. यावरून हा स्तर वाढत असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे. हा रिसर्च प्रतिष्ठित जर्नल नेचर कम्युनिकेशननं प्रकाशित केला आहे.

समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यानं येत्या काळात अनेक शहरं जगाच्या नकाशावरून गायब होतील, अशी भीती याआधीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीला उपग्रहातून घेतलेल्या फोटोंच्या आधार आहे. यानुसार २०५० पर्यंत जगातली बरीचशी शहरं पाण्याखाली गेलेली असतील. या भागावर सध्या १५ कोटी लोक वास्तव्यास आहेत. आधी सात बेटांवर वसलेल्या, त्यानंतर भराव टाकून एकत्र करण्यात आलेल्या मुंबईलादेखील पाण्याच्या वाढत्या पातळीचा फटका बसणार आहे.

आतासारखी परिस्थिती कायम राहिली, जागतिक तापमान वाढ नियंत्रणात आली नाही, तर २०५० मध्ये मुंबई कशी दिसेल, याचे फोटो संशोधनातून समोर आले आहेत. त्यानुसार पुढच्या ३१ वर्षांत दक्षिण मुंबई पाण्याखाली जाऊ शकते. समुद्राची पातळी वाढल्यास व्हिएतनामला सर्वाधिक फटका बसेल. २०५० पर्यंत व्हिएतनामचा दक्षिण भाग पूर्णपणे पाण्याखाली असेल. याचा फटका २ कोटी लोकांना बसेल. हो ची मिन्ह (व्हिएतनाम), बँकॉक (थायलँड), शांघाय (चीन), अलेक्झांड्रिया (इजिप्त), बसरा (इराक) या शहरांना जागतिक तापमान वाढीचा मोठा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

x