राणेंच्या पनवतीमुळेच फडणवीसांची सत्ता गेली: खासदार विनायक राऊत

रत्नागिरी: खासदार नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय दरी सर्वश्रुत आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांचा ट्विटरवर पोस्ट टाकून हल्ला करण्याचा एककलमी कार्य्रक्रम सुरु आहे. त्यात खासदार नारायणे यांनी देखील भर टाकण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर देखील भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार या आशेने नव्याने स्थापन केलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भारतीय जनता पक्षात विसर्जित करुण टाकला. त्यात कोकणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कणकवलीच्या बाहेर ताकद दाखवणं शक्य न झाल्याने सध्या खासदार राणे देखील संतापल्याचे दिसत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यालाच अनुसरून शिवसेनेने देखील नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या पनवतीमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय गाडी घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावं”, असा सणसणीत टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
अखेर मा.. नारायण राणे यांच्या पनवतीने मा. देवेंद्र फडणवीस बुडाले !!
आता मा.. नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे… @PTI_News #narayanraorane
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) November 26, 2019
“ज्याने माणसाने आयुष्यभर ठेकेदारी केली. राजकीय पदाचा फायदा घेत दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांच्या कृपेने मिळाले. त्या नारायण राणेला आता त्यांच्या अज्ञातवासामध्ये त्यांचा भूतकाळ आठवतो आहे. त्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना कसं फसवलं, चिटींग कशी केली हे सर्व आठवत असताना त्यांची बडबड, मुक्ताफळ सुरुच असतात. त्यामुळे आम्ही त्यांची दखल घेत नाही.” असा राजकीय टोला देखील राऊतांनी राणेंना लगावला आहे.
“नारायण राणेंना त्यांची जागा कोकणातील जनतेने दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी वनवासात जावं आणि शेवटचं आयुष्य हरि नामामध्ये मार्गक्रमण करावे.” असेही ते म्हणाले. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे राणेंच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला कोणतीही बाधा होणार नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार हे एक आदर्श सरकार बनेल. त्याचे अनुकरण आतापासून अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही त्या सरकारकडे अभिमानाने पाहतो आहे.” असे देखील शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.
Former CM Devendra Fadnavis Unable to Form Government in Maharashtra because of MP Narayan Rane said Shivsena MP Vinayak Raut
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं