आमच्याकडील गुजरातच्या निरमा पावडरने आम्ही नेत्यांना पक्षात घेताना धुवून घेतो: दानवे

मुंबई : भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना डागाळलेले नेते कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाते, असा प्रश्न एनसीपी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाला केला होता. सुळे यांच्या आरोपाला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे. नेत्यांना पक्षात घेताना या पावडरने धुवून घेतो, असे दानवे म्हणाले.
२०१४मध्ये सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस-एनसीपीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ज्यांच्यावर आरोप केले होते. त्याच नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतले जात आहे. हे डागाळलेले नेते आता सत्ताधाऱ्यांना कसे चालतात. त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन धुतले जाते, असा सवाल एनसीपीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुळे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेत उत्तर दिले होते.
Union Minister Raosaheb Danve Patil in Jalna, Maharashtra: BJP has a washing machine. Before taking anyone in the party, we wash them in the machine. We have the Nirma powder of Gujarat. (28.08.19) pic.twitter.com/WwGHvhEhbu
— ANI (@ANI) August 28, 2019
भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेस, एनसीपीच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत होते. लोकसभेआधी तर भारतीय जनता पक्षामध्ये मेगा भरती होती. परंतु, या भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांना खुद्द आरोप करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष प्रवेश देत उमेदवारीचीही माळ गळ्यात घालत असल्याने भाजपवर टीका होत होती. यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस, एनसीपीच्या नेत्यांना पक्षात घेताना त्यांच्यावरील आरोपांची, गुन्ह्यांची पडताळणी करूनच घेत असल्याचे सांगितले होते. यावर एनसीपीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अशी कोणती पावडर असल्याचे विचारले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे डॅशिंग रसायन असल्याचे उत्तर दिले होते. यावर सुळे यांनी या घातक रसायनापासून सावध रहा असा इशारा पक्षबदलू नेत्यांना दिला होता.
राज्यात युती असल्याने बहुतांश ठिकाणी शिवसेनेच्या वाट्याच्या जागांवर भारतीय जनता पक्षाने भरती चालविली होती. मात्र, या नेत्यांनी भाजपात घेताना त्यांना आमदारकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर नारायण राणेंसारखे अनेक नेते अद्यापही आश्वासन पूर्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांनीच भरती थांबविल्याचे जाहीर केले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं