मनसे आमदारचं २०१९'मधील पत्र राजकीय चष्म्यातून पाहिल्याने सरकारवर 'हे करू ते करू'ची वेळ? सविस्तर वृत्त

दारोडा : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. परिणामी दारोडा गावातील एका २४ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. काही वेळापूर्वी पीडितेचे पार्थिक तिच्या दारोडा गावात दाखल झालं आहे. आमच्या मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक महिलांनी त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी केली आहे. आमच्या मुलीला जसा त्रास झाला त्या नराधमालाही तसाच त्रास व्हायला हवा, असं म्हणताना गावकऱ्यांचा आक्रोश दिसून येत आहे.
दरम्यान, हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणीची प्राणज्योत मालवली. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थ केली, पण काळाने घाला घातला. मात्र या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणारन नाही, असं सांगतानाच आरोपीला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून जलदगतीने प्रयत्न करण्याचे आणि सर्व यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वास्तविक महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेते महाराष्ट्राच्या लेकीचा जीव गेल्यानंतर आम्ही हे करू आणि ते करू अशी भावना व्यक्त करत आहेत.
वास्तविक मंत्रिमंडळ वाटप आणि सत्तेच्या सौदेबाजीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी व्यस्त असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे बलात्कार आणि महिला अत्याचारासंबंधित “दिशा कायदा” महाराष्ट्रात देखील अमलात आणावा यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून भाजप सरकारच्या काळातील प्रकल्प रद्द करण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं दिसलं आणि त्यात तिन्ही सत्ताधारी पक्ष हातात हात धरून एकत्र आल्याचे दिसले. मात्र सत्ताधाऱ्यांनी तशीच एकी आणि इच्छा शक्ती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या संवेदनशील सूचनेकडे देऊन आंध्र प्रदेश प्रमाणे कायदा महाराष्ट्रात अमलात आणला असता तर आरोपीला २१ दिवसात शिक्षा सुनावत आली असती. परंतु आमदार राजू पाटील यांचं १७ डिसेंबर २०१९ मधील ते पत्र राजकीय चष्म्यातून आणि गांभीर्यातून न घेतल्याने सरकारवर आज आम्ही हे करू आणि ते करू अशी वेळ आली आहे असंच म्हणावं लागेल.
काय होतं ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं नेमकं पत्र?
आंध्र प्रदेश विधानसभेने #AndhraPradeshDishaAct पारित केलं. बलात्काराची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आता तरी महाराष्ट्रात तत्सम कायदा होईल का ? @CMOMaharashtra pic.twitter.com/kmpyit4bqv
— Raju Patil (@rajupatilmanase) February 10, 2020
Web Title: MNS MLA Raju Patil had given letter to CM Uddhav Thackeray over making Law like Andhra Pradesh.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं