महत्वाच्या बातम्या
-
भाजप आमदाराच्या गाडीत EVM मशीन सापडली | निवडणूक आयोग भाजपला मदत करतंय का? - अतुल लोंढे
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी भरभरून मतदान झाले. पश्चिाम बंगालमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८०.४३ टक्के तर आसामच्या ३९ जागांसाठी ७४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नंदिग्राममध्ये मतदान झाले असून, ममता आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी या दोघांनीही विजयाचा दावा केला. बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल ट्रेन | राज्य सरकारकडून महत्वाची माहिती
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाउनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल,” अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ‘वर्षा’वर बोलावली महत्वाची बैठक
राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे. तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोोरनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे पोलीस दलातील राठोड दाम्पत्यावर रश्मी शुक्लांनी बेकायदेशीर कारवाई केली होती - हरिभाऊ राठोड
राज्यात फोन टँपिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापला होताआहे. त्यात राज्य सरकारला मुख्य सचिवांनी अहवाल सादर केल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने गृह विभागाकडून मान्यता घेतली होती आणि तीच त्यांनी सरकार विरोधात वापरल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. पुण्यातील खंडणीप्रकरनानंतर आता रश्मी शुक्ला यांचावर अजून एक आरोप करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये लोटसचं ऑपरेशन | भाजपचे माजी आमदार नितीन पाटील शिवसेनेत
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंच्या गाडीतील ती नोटा मोजण्याची मशीन त्यांची नव्हे | संबंधित महिलेला अटक
अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासोबत दिसलेल्या ‘महिलेचं’ रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
HSC Board Exams 2021 | 3 एप्रिलपासून 12'वी च्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांना 3 एप्रिलपासून परीक्षेचे हॉलतिकीट ऑनलाईन उपलब्ध येणार आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयं महाराष्ट्र राज्य बोर्डच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरुन हॉलतिकीट डाऊनलोड करु शकतील. यासाठी त्यांना शाळा/महाविद्यालयांचा लॉगईन आयडी (Login ID) वापरावा लागेल.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस
महाराष्ट्रात कोराेनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर जात आहे. राज्यात २८ मार्चला ४०,४१४ रुग्ण आढळले होते. यानंतर ३१ मार्चला ३९,५४४ रुग्ण वाढले. गुरुवारी हा आकडा वाढून पुन्हा ४३,१८३ झाला. महाराष्ट्रात मार्च महिन्यात ६.५१ लाख नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिका | कोरोनाने घरी मृत्यू झाल्यास नातेवाईकच अंत्यसंस्कार करतील
कोरोना रुग्णांच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेनं एक नवा नियम आणला आहे. त्यानुसार घरात उपचार घेताना एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. त्यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकच पूर्ण करतील. फक्त गाडीची सुविधा पुरवली जाईल. महापालिकेच्या या नव्या नियमाची माहिती एका वृत्तामुळे समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ केल्याचा शेरा मारून फाईल सरकवायचे पराक्रमी मंत्री - सविस्तर
सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यांवर पदाच्या गैरवापर केल्याचा आरोप भाजपकडून करणं सुरु आहे. मात्र भाजपमधील म्हणजे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचे पराक्रम देखील मोठे आहेत ज्याचा अनेकांना विसर पडला असावा. तत्कालीन फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नेमकं का हटविण्यात आलं होतं, याचं कोणताही स्पष्टीकरण तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी अद्यापही दिलेलं नाही.
4 वर्षांपूर्वी -
कर्मभूमीचं ऋण अपार मानणाऱ्या अभिनेत्याचं मनसेतर्फे मनापासून अभिनंदन - राज ठाकरे
सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला कोरोनाचं काही पडलेलं नाही | केवळ आम्ही सत्तेत कसं येऊ शकतो याकडेच लक्ष
राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? | पवारांची अहमदाबादला भेट? | जयंत पाटील यांचं उत्तर
राज्यात सध्या अनेक विषयांवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अहमदाबादमध्ये शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असं वृत्त समोर आलं आणि महाराष्ट्रात राजकीय वारे वाहण्यास सुरुवात झाली. अर्थात राष्ट्रवादीने ही भेट झाली नसल्याचे म्हटले असले तरी चर्चा या सुरुच आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सध्या लॉकडाउनचा विचार नाही, पण यंत्रना सज्ज ठेवणं सरकारचं काम - आरोग्यमंत्री
महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. मात्र राज्य सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
कामचुकारपणामुळे महिलेला कामावरून काढण्यात आलेलं | संबधित महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल आहे
परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
दोनच दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांवरील खटला रद्द | आता तृप्ती देसाईंच्या पुढाकाराने अजून एक प्रकरण समोर
परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. राजेश विटेकर यांनी माझे अश्लील व्हीडिओ तयार करुन माझ्यावर वर्षभर अत्याचार केले. मी या सगळ्याविरोधात तक्रार केली होती. माझ्याकडे सर्व पुरावेही आहेत. पण मला केवळ तपास सुरु असल्याचे सांगितले जाते. तर राजेश विटेकर यांनी शरद पवार यांच्या पाठबळामुळे माझ्यावर गुन्हा दाखलच होणार नाही, असे सांगून मला घाबरवल्याचे या पीडित महिलेले म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसुख हिरेन प्रकरणी परमबीर सिंग ATS'च्या पत्रांना रिप्लाय देत नव्हते | मोठा खुलासा
सध्या मनसुख हिरेन प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याभोवती देखील संशयाचे वादळ निर्माण होताना दिसत आहे. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन हत्येचा खुलासा यापूर्वीच झाला असता. जर मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य केले असते. महाराष्ट्र एटीएसमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हे प्रकरण याआधीच उलगडलं असतं, परंतु मुंबई पोलीस मुख्यालयाकडून आम्हाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची परवानगी दिली नाही. त्यासाठी आम्ही तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चार पत्रही पाठवली होती, मात्र त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय आला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले.
4 वर्षांपूर्वी -
हे पत्र आपणच ५ महिन्यांनी काढलं, आत्ता घाई का करता आहात? - जितेंद्र आव्हाड
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या भष्ट्राचाराच्या झालेल्या गंभीर आरोपांची चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली. या समितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडलं आहे. ज्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. मग फडणवीसांनी आणखी एक उत्तर दिलं.. त्या उत्तरावरही पुन्हा प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेडीरेकनर दरात वाढ नाही | मुद्रांक शुल्क सूट संपुष्टात
करोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदरांना (रेडीरेकनर) अद्याप सहाच महिने झाले असल्याने यंदा रेडीरेकनर दरांत वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षासाठी सध्याचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वय वर्ष ४५ पेक्षा अधिक | आजपासून कोरोना लसीकरण | हे आहेत तुमचे प्रश्न आणि त्याची उत्तरं
देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्व लोक कोरोना लसीचे डोस घेऊ शकतील. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर्स, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. आता या लसीकरण अभियानात सहभागी लोकसंख्या ही कामासाठी बाहेर पडणारी आहे. त्यांना घरात राहणे शक्यच नाही. म्हणूनच १ एप्रिलनंतर भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरेल, असे सरकारला वाटते.
4 वर्षांपूर्वी