महत्वाच्या बातम्या
-
आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
आज राज्यात ५३१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज १६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ८६ मृत्यू हे मागिल ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मागिल कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ८४,२४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ % एवढे आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर इंजेक्शन निघालं आहे, पण ते सामान्यांना परवडणारं नाही - शरद पवार
सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
कोणाच्या मनात सध्या काय चाललंय कसं ओळखावं, अजित पवारांची त्या भेटीवर प्रतिक्रिया
सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बारामतीत डिपॉझिट जप्त झालं, सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना विक्रम रचतोय...एका दिवसात ५ हजार २४ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक ५,०२४ रुग्ण वाढले आहेत. तर १७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यातले ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला झालेला महारोग असं मी म्हणणार नाही- अनिल गोटे
भाजपचे आमदार गोपीचंद पडाळकर यांनी राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या थराला जाऊन टीका केल्याने सर्वत्र रोष पसरत आहे. आता या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनीही उडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझाय विश्वासघात केला, पण संतापाच्या भरात मी कधी फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग आहे, असे म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी असे बोलणार नाही, असं ते म्हणाले. गोटे यांनी एक जाहीर पत्रक काढून थेट नामोल्लेख करत फडणवीसांवर गंभीर आरोप केल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान, पुन्हा लॉकडाउनची घोषणा
नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. त्यामुळे नवी मुंबईत २९ जूनपासून पुन्हा लॉकडाउन घोषित करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे २९ जूनपासून ७ दिवसांसाठी हा लॉकडाउन असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाउन असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पेट्रोल डिझेल दर वाढीविरोधात काँग्रेस सोमवारी जोरदार आंदोलन छेडणार
आज काँग्रेसच्या वतीने राज्यभरात लडाखच्या गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल सुनील बाबू यांच्यासहित 20 जवानांना आदरांजली वाहण्यासाठी “शहीदों को सलाम” दिवस आयोजित करण्यात आला होता. त्याचवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने सतत 19 दिवस चालू ठेवलेल्या डिझेल, पेट्रोल यांच्या दरवाढीचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच येत्या सोमवारी 29 जूनला काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 8 सागरी किनाऱ्यांवर चौपाटी कुटी
राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असतील.
5 वर्षांपूर्वी -
सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळानं घेतला मोठा निर्णय
कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या सलून सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात येत्या रविवारपासून म्हणजेच 28 जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनदरम्यान सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र अनलॉकिंगनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहे.सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गोपीचंद पडळकरांना पवारांविरोधातील वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीच्या निषेधार्थ आज (गुरुवार) पुण्यात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. मंडई परिसरात पडळकर यांचा पुतळा जाळून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करतात - आ. रोहित पवार
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही.
5 वर्षांपूर्वी -
पतंजलीच्या 'कोरोनिल'ला महाराष्ट्रात बंदी..राज्य सरकारचा निर्णय
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केलेचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर ‘कोरोनिल’ हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे ३८९० नवे रुग्ण, डिस्जार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
देशभरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये - पडळकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याचे पडळकर यांनी सुचवले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी पालकमंत्रीच आरोग्यमंत्री होते, खासदार डॉक्टरच आहेत, तरी KDMC'ची आरोग्यसेवा थर्डक्लासच
ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या व तुटपुंजी उपाययोजना लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांसह चार आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र खरी गरज आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता बदला अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, गोपीचंद पडलकरांचं धक्कादायक विधान
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी -
परप्रांतीय मजूर परतत आहेत, रोहित पवारांचं मराठी तरुणांना मनसे आवाहन
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात १४४ रेल्वेगाड्यातून ३० हजार मजूर पुण्यात परतले आहेत. 22 हजार थेट पुणे रेल्वे स्टेशनवर तर 8963 जण लोणी, दौंड, उरुळी कांचन अशा स्थानकांवर उतरले आहेत. लॉकडाउनच्या काळात 139 रेल्वे गाड्यातून 1 लाख 80 हजार मजूर मुळगावी गेले होते. पण, आता पुण्यात मोठ्या संख्येनं मजूर परत येत आहे. पुणे -पटणा, मुंबई- बंगलोर, भोपाळ-गोवा, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-गदग या गाड्या जेव्हा परत फिरतात तेव्हा या गाड्यातून साधारण २००० प्रवासी रोज परत येत आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह - फडणवीस
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी