महत्वाच्या बातम्या
-
मनसैनिकांना 'दंडुका मोर्चा'त 'दडुंका-बंदी' घालून पोलीस दंडुका घेऊन बंदोबस्तावर येणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर मुद्यावर झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी औरंगाबाद येथे भव्य दंडुका मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मोर्चासाठी येताना स्वत: जवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीमधील सर्व अटींचे तंतोतंत पालन करावे. तसेच कायद्याचा आदर राखावा, असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
विधानभनवाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला अटक
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असून तो आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर राजीनाम्याच्या कागदी होड्या सापडल्याचे वृत्त: विखे पाटील
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारी केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर राजीनाम्याच्या काही कागदी होड्या सापडल्या आहेत, अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट पत्रकार परिषदेत केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मूळ प्रश्न सोडून 'राम मंदिर' गंभीर विषय करणाऱ्या सेनेला मतदार अद्दल घडवू शकतो: सविस्तर
सध्या देशात विविध प्रश्नांनी शहरी आणि ग्रामीण जनता त्रासलेली आहे. त्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि उद्योगांचा घसरता आलेख असे एक ना अनेक गंभीर प्रश्न राज्यापुढे असताना केवळ आगामी निवडणुकीच्या उद्देशाने प्रेरित होऊन आणि मतदाराला गृहीत धरून राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा असल्याचे देखावे करणाऱ्या शिवसेनेबद्दल सामन्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य लोंकांना अशा विषयांमध्ये काहीच रस राहिलेला नसून केवळ याच विषयाला पुढे रेटणाऱ्या शिवसेनेविरुद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
पक्षप्रमुख अयोध्याला असताना अनेकांचा सेनेला राम-राम करत शिवसंग्राममध्ये प्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत शिवसंग्राम पक्षाचा भगवा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला जयमहाराष्ट्र करताना पक्षाचे विधानसभा प्रमुख सुदर्शन धांडे यांनी “शिवसैनिक वाघांनो सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा” ही समाज माध्यमांवर टाकलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: ‘संवाद यात्रा’ विधान भवनावर येण्याआधीच कार्यकर्त्यांची धरपकड
सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज ‘संवाद यात्रा’ आयोजित केली आहे. आज मुंबईमध्ये थेट विधान भवनावर धडकणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मुंबईमध्ये विधानभवनावर धडक देणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
प्रभू श्रीराम म्हणतात, देश घातलात खड्यात आता माझ्या नावाने!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी आजच्या व्यंगचित्रातून अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर बोचरी टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच त्यांना राम मंदिर आठवलं
भारतीय जनता पार्टीने सामान्यांना विकासाची दाखविलेली स्वप्ने पूर्णपणे भंग पावल्याने ते सामान्यांचे मन विचलित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. असे असले तरी रामाच्या नावावर भविष्यात पुन्हा मते मिळणार नाहीत,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा आमच्या युतीसाठी पोषक : फडणवीस
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अयोध्येतील राम मंदिराच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान, काल पासून ते अयोध्येच्या दौऱ्यावर असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित प्रकरणावर प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या दौऱ्याचे सर्मथन केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांआधी राम-राम आणि निवडणुकांनंतर आराम, हेच मोदी सरकारचं काम
येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, अयोध्येला येण्यामागे माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. मी केवळ देशातील तमाम हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे. परंतु, आता मोदी सरकारने तमाम हिंदुंच्या भावनांशी अजिबात खेळू नये. एवढे दिवस, वर्षे आणि पिढी गेली तरी अजून अयोध्येत राम मंदिर उभे राहत नाही. युपीचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीच सांगितल्याप्रमाणे मंदिर येथे होतं, आहे आणि राहिलं सुद्धा या मताशी आम्ही पण सहमत आहोत. परंतु, हे राम मंदिर आम्हाला दिसत का नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची अयोध्यावारी रिलायन्सच्या विमानातून?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २ दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सकाळीच ते सहकुटुंब एका विशेष विमानाने अयोध्येला रवाना झाले. परंतु त्यांचं कुटुंब ज्या विशेष विमानाने अयोध्येला गेलं ते अंबानी समूहाचं असल्याचं समोर येत आहे. तसा लोगो सुद्धा त्यावर स्पष्ट दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे कुटुंबीय आज विशेष विमानाने अयोध्येला रवाना होणार
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. आधीच भाजप समर्थक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा आणि लॉन्गमार्च आयोजित करत आहेत. त्यात उद्या उद्धव ठाकरे कुटुंबीय सुद्धा आज विशेष विमानाने अयोध्येला प्रयाण करत आहेत. सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण करून त्याचा पक्षाला कसा फायदा करून घेता येईल अशी सत्ताधाऱ्यांची रणनिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: १ डिसेंबर फार दूर नाही, किती जल्लोष होतो ते पाहूच; मुख्यमंत्र्यांना टोला
१ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची घोषणा म्हणजे मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचे पवार म्हणाले. मराठा आणि ओबीसी या दोन समाजांमध्ये फूट पाडून निवडणुका जिंकण्याचे फडणवीसांचे दिवास्वप्न असल्याची बोचरी टीका एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदे दरम्यान केली. आता १ डिसेंबर ही तारीख तर खूप नाही; त्यामुळे किती त्यांच्या घोषणेप्रमाणे किती जल्लोष होतो हे सुद्धा पाहूच, असा सणसणीत टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भतील विधानावरून लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नगर निवडणूक: भाजप खासदारांचे कुटुंबीय व सेना विद्यमान विरोधी पक्ष नेत्याचा अर्ज बाद
स्थानिक महापालिका निवडणुकीसाठी आयत्यावेळी केडगावचे काँग्रेसचे तब्बल ५ उमेदवारांना भाजपात प्रवेश देऊन निवडणुकीत आघाडीवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीआधीच मोठी चपराक मिळाली आहे. करण भाजपचे तब्बल ४ महत्वाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यात धक्कादायक म्हणजे यात स्वतः भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान खासदार दिलीप गांधी याचे पुत्र सुवेद्र गांधी तसेच त्यांच्या स्नुषा दीप्ती सुवेद्र गांधी यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्येत संयुक्त व्यापार मंडळं उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार
अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरु करण्यात यावे यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर इतर अनेक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत त्याच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यात स्थानिक व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना निर्माण झाली असून केवळ निवडणुकीच्या राजकारणापायी इथली शांती भंग करण्याचा या संघटनांनी चंग बांधला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी आयुक्तांसोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव हे केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज हे महापौर बंगला मागत आहेत, उद्या राज भवन सुद्धा मागतील. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
मुंढेंची बदली झाल्याच्या आनंदाने भाजपाचा फटाके फोडून आनंदोत्सव
कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या निमित्ताने नाशिक भाजपने फटाके फोडून दिवाळी साजरी केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या दबावानेच मुंढे यांची अवघ्या ९ महिन्यांमध्ये नाशिकच्या आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
दूध आणि अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप: गिरीश बापट
यापुढे महाराष्ट्रात दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून सामान्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना यापुढं जन्मठेपेची शिक्षा होणार आणि तशी अधिकृत माहिती गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत दिली. त्यासाठी सरकारकडून कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आझाद मैदानावर जाऊन उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची भेट घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत. आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दुपारी १.०० वाजता ही भेट होणार असल्याचे समजते. काही दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या शिक्षकांची सुद्धा ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मातीत राबणारा बळीराजा मुंबईत, तर सत्ताधीश हेलिकॉप्टरने मातीचा कलश घेण्यासाठी शिवनेरीवर
राज्यातील दुष्काळ तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील बळीराजा आणि आदिवासींनी भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. भव्य लोकसंघर्ष मोर्चा मुंबईतील सोमय्या मैदानातून आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. प्रलंबित वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि संपूर्ण कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा आणि आदिवासींनी हा भव्य मोर्चा काढला आहे. दरम्यान, झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी ठाणे, पालघर पासून ते थेट भुसावळ जिल्ह्यातील बळीराजा आणि आदिवासी समाज एकवटला आहे.
7 वर्षांपूर्वी