महत्वाच्या बातम्या
-
नवीन घर बांधकाम ग्रामपंचायतीत कसे नोंद करावे? | असा करा अर्ज - नक्की वाचा
आपण जर गामपंचायत हद्दीमध्ये नवीन घर बांधकाम केले असेल किंवा जुने घर दुरुस्ती केला असाल तर ते घर आपल्या नावे मालक सदरी नोंद करावे लागते. आपल्यला ते घर नोंद होण्यासाठी ग्रापंचायतीला सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे अर्ज करावा लागतो . त्यानंतर ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली जाते . त्यामध्ये आपण दिलेला अर्जाचे वाचन केले जाते योग्य ती कागदपत्र पहिली जातात त्यानंतर आपला अर्ज मजूर केला जातो . त्यानंतर अपलाल्या आपल्या नावाचा ग्रामपंचात घरठाण उतारा मिळाला जातो.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारने खोटी स्टोरी रचली | फडणवीसांचा गंभीर आरोप
विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. परंतु, पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष समोरा-समोर आले. तसेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली. विरोधक आमदारांनी अध्यक्षांचा माईकही ओढला. या गैरवर्तनानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. आता यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार | राज्य सरकारचा निर्णय
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप आमदारांचा धुडगूस | सभागृह अध्यक्षांना धक्काबुक्की आणि आई-बहिणीवरून शिव्या | १२ आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभ्रम कौशल्य | 'OBC राजकीय आरक्षण' असा शद्धप्रयोग न करता फडवणवीसांच्या प्रत्येक वक्तव्यात 'OBC आरक्षण' शब्दप्रयोग
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे
4 वर्षांपूर्वी -
उज्ज्वला गॅस योजनेसाठी डेटा वापरता, ओबीसींसाठी का दिला जात नाही? | भुजबळांनीकडून फडणवीसांची पोलखोल
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे
4 वर्षांपूर्वी -
OBC राजकीय आरक्षण | इंपेरिकल डेटा केंद्राचा की राज्याकडून? | विधानसभेत धक्काबुक्की
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे. तर, सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने ओबीसींचा इम्पिरीकल डेटा द्यावा | भुजबळांनी विधानसभेत ठराव मांडला..फडणवीस म्हणाले
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. त्यावर हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी कुठेही गायब झालो नव्हतो | मी काही मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी नाही - आ. प्रताप सरनाईक
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. जेव्हा माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं, असं सांगून प्रताप सरनाईक यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सरनाईक हे आघाडी सरकारवर नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार | उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा
राज्यात आज 5 आणि उद्या 6 जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्नील लोणकर आत्महत्या | SEBC संदर्भात 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मुलाखती रखडल्या - उपमुख्यमंत्री
एमपीएससी परीक्षेतील उमेदवार स्वप्नील लोणकर यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यावरुन, सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलीच जुपल्याचे पाहायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांस 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात गडकरींच्या कारखाण्याचीही तक्रार | भाजपमध्ये अंतर्गत कलह?
राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आमदारांसह नेतेमंडळी सभागृहात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नितीन गडकरी यांच्या कारखान्यावरील कारवाईच्या मागणीवरुन भारतीय जनता पक्षाला टोला लागवला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं ते म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षामधील एका गटाकडून गडकरींना लक्ष्य केलं जातंय, असा आरोपही त्यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Monsoon session | २ दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार | काय असतील महत्वाचे मुद्दे?
सोमवारपासून सुुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला अाहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये वादळी चर्चा होऊन केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा निर्णय झाला. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. परिणामी, नाराज मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे प्रसारमाध्यमांना सामोरे न जाता निघून जाणे पसंत केले.
4 वर्षांपूर्वी -
मराठी कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण | एकाला अटक, ५ जणांवर गुन्हा दाखल
कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
4 वर्षांपूर्वी -
सेव्हन इलेव्हन क्लब प्रकरणी फडणवीस अडचणीत | समर्थकाला अतिरिक्त चटईक्षेत्र मंजुरी | कोर्टात याचिका
विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक गैव्यवहारावरून आधीच नागपुरातील वकिलाने गंभीर आरोप करतांना न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारने देखील जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारावरून एसआयटी नेमली आहे आणि त्यामुळे देखील भविष्यात फडणवीस अडचणीत येऊ शकतात. मात्र आता त्यात अजून एक भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सुप्रीम कोर्टाकडून भूमिका स्पष्ट तरी भाजप नेते केंद्राची जवाबदारी झटकून राज्याला इशारे देण्यात व्यस्त
आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केलं. धक्कादायक म्हणजे यापूर्वी विनायक मेटे यांनी देखील खात्री न पटलेल्या नक्षलींच्या त्या पत्रावरून समर्थन करत राज्य सरकारला इशारा दिला होता आणि आज नरेन्द्र पाटील यांनी त्याचीच पुनरावृत्ती केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | माजगाव डॉक'मध्ये 1388 पदांची भरती | शेवटचा दिवस, ऑनलाईन अर्ज करा
मुंबई, ०४ जुलै | मॅझॅगॉन डॉक शिपबिल्डर भरती २०२१. मॅझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबईने 1388 बिन-कार्यकारी पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार माझॅगन डॉक भरती 2021 साठी 04 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी खाली लिंक दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करु शकतात.
4 वर्षांपूर्वी -
MPSC मायाजाल आहे यामध्ये पडू नका | सुसाईड नोट लिहीत MPSC उत्तीर्ण तरुणाची आत्महत्या
पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यात आता खळबळ उडाली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी स्वप्नीलने लिहिलेली सुसाईड नोट मन हेलावून टाकणारी आहे. स्वप्निलने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती रोखल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवड पावसाळी अधिवेशनातही टळणार? | आघाडीचे प्रत्युत्तर
मागील चार महिने रखडलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दबावाला सरकार भीक घालत नसल्याचे दाखवण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आघाडीच्या समन्वय समितीत झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जशी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची शिफारस प्रलंबित ठेवली आहे, तसे आम्हीसुद्धा विधानसभा अध्यक्षपद प्रलंबित ठेवू शकतो, हे आघाडीला दाखवायचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील मराठा-OBC आरक्षण, केंद्राकडील राज्याचे ३० हजार कोटी संदर्भात शहांना पत्र लिहीत नाहीत
राज्य महाविकास आघाडी सरकार आल्यापासून राज्यातील अनेक संस्था भाजपच्या हातून निसटल्या आहेत. विशेष करून कोल्हापूर स्वतःच्या मुठीत घेण्याचा चंद्रकांत दादांचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि आता कोल्हापुरात सरपंच देखील निवडून आणण्याची त्यांच्यात राजकीय शक्ती उरलेली नाही हे देखील पाहायला मिळतंय. संपूर्ण सत्ताकाळात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतःचं राजकीय साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाविकास आघाडी सरकार आलं आणि पुढच्या वेळी ते पुण्यातून निवडून येतील का यावरही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे.
4 वर्षांपूर्वी