Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
वंचित’मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका | वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका | महाराष्ट्रनामा – मराठी
1 May 2025 7:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका

VBA, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, NCP, Congress, Balasaheb Thorat

मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस – एनसीपी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.

राज्यातील जवळपास ३२ जागांवर काँग्रेस एनसीपीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस एनसीपीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे. वंचितने काँग्रेस एनसीपीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांना वंचित आघाडीला पुढे करून जे काही करायचं होतं, ते करण्यात त्यांना यश आलं आहे,’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आणखी मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र काँग्रेसलाही समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-सेनेवर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव झाला नाही. काश्मीरमधील कलम ३७० यासारखे भावनिक मुद्दे चालले नाहीत. जनतेच्या समस्या सत्ताधारी भूमिका मांडण्यात कमी पडले. म्हणूनच त्यांच्या जागा घटल्या,’ अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

x