वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका

मुंबईः लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस – एनसीपी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील जवळपास ३२ जागांवर काँग्रेस एनसीपीचे उमेदवार अगदी ५ ते १० हजार मतांच्या फरकाने पडले आहेत. तर त्याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. वंचितला मिळणारी ही सर्व मते काँग्रेस एनसीपीला मिळणारी मते असल्याचे बोलले जात आहे. वंचितने काँग्रेस एनसीपीसोबत आघाडी केली असती तर राज्यात आघाडीला सव्वाशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या, हे आता निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांना वंचित आघाडीला पुढे करून जे काही करायचं होतं, ते करण्यात त्यांना यश आलं आहे,’ असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नसल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आणखी मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र काँग्रेसलाही समाधानकारक जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-सेनेवर निशाणा साधला आहे.
‘महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव झाला नाही. काश्मीरमधील कलम ३७० यासारखे भावनिक मुद्दे चालले नाहीत. जनतेच्या समस्या सत्ताधारी भूमिका मांडण्यात कमी पडले. म्हणूनच त्यांच्या जागा घटल्या,’ अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं