फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले?

मुंबई : फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारनं ५० कोटी वृक्ष लावण्याचा दावा केला होता. यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर दरवर्षी साधारणत: १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या अभियानातून अपेक्षित काम न झाल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधल्या काही मंत्र्यांनी उपस्थित केली होती. त्यांनी या संदर्भात लेखी पत्रदेखील दिलं. त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी या अभियानाच्या अंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिल्यानं विभागाचे प्रधान सचिव येत्या आठवड्यात नागपुरला जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत किती वृक्ष लावण्यात आले, त्यातले किती वृक्ष जगले, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांपैकी किती देशी होते, किती परदेशी होते, याची चौकशी प्रधान सचिवांकडून करण्यात येईल. दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केलं आहे. सरकारनं वृक्ष लागवडीची चौकशी करावी. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीचा आढावा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचं स्वागत केलं आहे. वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे,’ असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात ३३ कोटी वृक्षांची लागवड केल्याचा दावा केला सरकारनं केला होता. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानावर वर्षाकाठी साधारण १ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, नेमकी किती वृक्षांची लागवड झाली याबद्दल अनेकांना संशय होता. वृक्षसंवर्धनाचं काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सरकारच्या दाव्याबद्दल त्यावेळी आश्चर्य व्यक्त केले होते.
तत्पूर्वी, भारत सरकारच्या केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागामार्फत समृद्ध जंगल असणाऱ्या टॉप ८ राज्यांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या यादीत सिक्कीम, मिझोराम सारख्या छोट्या राज्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त झाला होता. परंतु, या यादीत महाराष्ट्राला कोणतेही स्थान मिळालेले नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाज माध्यमांच्या माध्यमातून केला होता.
महाराष्ट्रातली जंगलं समृद्ध नाहीत.
समृद्ध जंगलांच्या टॉप ८ महाराष्ट्राला स्थान नाही. केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण विभागाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. देवादिकांच्या संख्येएवढी झाडं लावूनही राज्य उजाडच! #jungle में मोर नाचा किसीने ना देखा? @SMungantiwar pic.twitter.com/baBietvEwx— NCP (@NCPspeaks) July 12, 2019
दरम्यान, मागील ५ वर्षांपासून आधीच्या फडणवीस सरकारने ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत हजारो कोट्यवधी वृक्ष लागवडीसाठी खर्च केले होते. मग, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राला स्थान का नाही? असा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे. मग फडणवीस सरकारने लावलेली करोडो झाडं गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
यावर त्यावेळी राष्ट्र्वादीने प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, ‘सर्रास जंगलतोड होतेय. प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. दरवर्षी कोटींच्या संख्येने वृक्षलागवड करूनही महाराष्ट्राची जंगले समृद्ध झाली नसतील तर वृक्ष लागवडीच्या जनजागृतीसाठी निघालेल्या मंत्र्यांनी हजारो कोटी फस्त करून जनतेची फसवणूक केली असंच म्हणावं लागेल असं देखील राष्ट्रवादीने म्हटलं होतं. दरम्यान मागील वर्षात अनेकवेळा दिवसाला करोडो झाड लावल्याचा दावा वारंवार फडणवीस सरकारने जाहिरातबाजी करत केला आहे. मात्र सरकारने खोदलेल्या लाखो विहिरींप्रमाणे, सध्या करोडो झाडं देखील गेली कुठे असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Story ex Forest Minister Sudhir Mungantiwar welcomes decision of Mahavikas Aghadi to probe tree sapling.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं