Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wp-pagenavi domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the schema-and-structured-data-for-wp domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the breadcrumb-navxt domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114

Notice: Function register_sidebar was called incorrectly. No id was set in the arguments array for the "Sidebar" sidebar. Defaulting to "sidebar-1". Manually set the id to "sidebar-1" to silence this notice and keep existing sidebar content. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 4.2.0.) in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर | विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर | महाराष्ट्रनामा – मराठी
1 May 2025 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार Motilal Oswal Mutual Fund | शेअर्स नको, ही म्युच्युअल फंड योजना मल्टिबॅगर परतावा देईल, फायदा घ्या Tata Power Share Price | टाटा पॉवर घसरतोय, पण पुढे मजबूत कमाईची संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, फायद्याचे संकेत - NSE: VEDL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमधील घसरण थांबेना, आता काय करावं - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: YESBANK
x

विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर

BJP, BJP Maharashtra, Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi, VBA

पुणे : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

‘वंचित’ने २८८ जागा लढवण्याचा उद्देशाने राज्यभरात उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ही प्रक्रिया मंदावली होती. विधानसभा निवडणुकीत वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील राजगृहावर अ‍ॅड. आंबेडकर यांची नुकतीच भेट घेतली. मात्र, जागावाटपाबाबततिढा अद्यापही सुटलेला नाही.

दरम्यान, वंचित आघाडीची स्थापना झाल्यापासून प्रकाश आंबेडकर सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसले. मात्र भाजपचे दिल्ली ते गल्लीतील प्रतिक्रिया देण्यास उतावळे असणारे नेते आणि प्रवक्ते काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अगदी मित्रपक्ष शिवसेनेवर देखील तिखट किंवा संयमाची प्रतिक्रिया देताना दिसतात. मात्र त्यात प्रकाश आंबेडकर यांना कधीही लक्ष केलं जात नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. किंबहुना भाजप नेत्यांची प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतील एकूणच देहबोली म्हणजे त्यांना दिल्लीतूनच काही सूचना आहेत का? असा संशय राजकीय विश्लेषक व्यक्त करतात.

काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीमुळे नुकसान होऊन देखील आजही संयमाची भूमिका घेत आघाडीची हात पुढे करत आहेत. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या एकूण मागण्या विचारात घेता, ते जाणीवपूर्वक अशा मागण्या करतात ज्या देशातील कोणताही पक्ष मान्य करणार नाही. वास्तवापेक्षा अवास्तव प्रतिक्रियांवरच प्रकाश आंबेडकरांचा भर असतो आणि आघाडी होऊच नये अशी त्यांची इच्छा आहे का? अशी शंका राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात. एखाद्या पक्षाला चालून आलेली संधी एखादा नेता इतक्या सहज कशी काय हातून घालवतो हे विरोधकांना समजण्या पलीकडील आहे. एका बाजूला भाजप आणि आरएसएस’वर टीका करून मी भाजप आणि आरएसएस विरोधी असल्याचं दाखवून आरएसएस संबंधित लोकांना पक्षात महत्वाची जवाबदारी देऊन मूळचे आंबेडकरी विचारांचे नेते पक्षातून बाहेर फेकले गेले अशी खंत पक्षातीलच लोकं बोलून दाखवत आहेत. एकाबाजूला मराठा समाजात आरक्षणाच्या नावाने स्वतःकडे खेचण्याचं राजकरण, तर दुसऱ्या बाजूला भाजपाला कधीच न मिळणारी आंबेडकरी विचारांची मतं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे देखील जाऊ द्यायची नाहीत आणि उरलेली मुस्लिम मतं त्याच वंचित आघाडीचा भाग असलेल्या एमआयएम’कडे वर्ग करायची आणि त्यासाठीच ही योजना असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. त्यामुळे टीका केलीच तर ती केवळ ओवेसी किंवा एमआयएम’वर करून मुस्लिम मतं त्यांच्याकडे वर्ग करायची राजकीय चाणक्यगिरी असंच म्हणावं लागेल.

दरम्यान पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली. बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना कवाडे यांनी ‘आंबेडकरांनी वंचित आघाडी तयार केली मात्र त्यात रिपाइला कुठेच स्थान नसल्याचही त्यांनी सांगितलं. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता असंही कवाडे म्हणाले.

पुढे बोलताना ‘भाजपचं वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली आहे. मात्र आमचा सन्मान केला गेला नाही, तर मात्र आम्ही स्वबळावर राज्यात ५१ जागा लढवू’ असंही कवाडे म्हणाले.

तत्पूर्वी, ठाण्यात मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे हेदेखील उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली असली तरी त्यात रिपाइंला कुठेच स्थान नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचा प्रतत्य लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइंचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर उमेदवार उभा केला नसता असाही आरोप त्यांनी यावेळी केला. एकूणच भाजपवाली मंडळीच या वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे. वंचित आघाडीनही २८८ जागा लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना आता मतदारांंपर्यंत पुन्हा नवे चिन्ह पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला दिले आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांना आता ‘सिलिंडर’ घरोघरी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागेल. वंचितच्या सर्व उमेदवारांसाठी हे एकच चिन्ह असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

x