अमित शाह यांचे स्वागत करण्यासाठी भाजपने सभागृहातून पळ काढला? सविस्तर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला काल बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं. त्यानुसार दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत होते. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होत्या.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी बहुमत चाचणीदरम्यान बहिष्कार टाकत सभागृहातुन बाहेर पडले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने केलेल्या बहिष्कारावर सर्वच थरातून टीका करण्यात आली. मात्र त्यावर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील वेगळाच पुरावा समोर आणत भाजपाला तोंडघशी पडण्याच्या प्रयत्न केला आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येणार असल्याने भाजपने बहिष्काराचं कारण पुढे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अशी एक चर्चा आहे की, भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत करायला देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांना जायचे होते म्हणूनच #भाजप ने सभागृहातून पळ काढला.
— Sachin Sawant (@sachin_inc) November 30, 2019
Greeted our @BJP4India National President & Hon HM @AmitShah ji at Mumbai Airport.
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले, तेव्हा मन:पूर्वक स्वागत केले. pic.twitter.com/7QHLB2UZWk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 30, 2019
दरम्यान आज भारतीय जनता पार्टीने ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा होणार आहे. भारतीय जनता पक्षाने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने राज्यातील विधानसभा निवडणूक बिनविरोध पार पडणार हे निश्चित झालं.
याबाबत माहिती देताना, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा. महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे की अध्यक्षांचे पद हे वादात आणायचे नाही. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे पाटील यांनी सांगितले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं