CAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.
Mumbai: NCP Chief Sharad Pawar,former Union Minister Yashwant Sinha,Vanchit Bahujan Aghadi’s Prakash Ambedkar and other leaders at Gateway of India during ‘Gandhi Shanti Yatra’, a protest against #CitizenshipAmendmentAct and #NationalRegisterofCitizens pic.twitter.com/gDG6otbWxf
— ANI (@ANI) January 9, 2020
केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला असून सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या एकतेला तडे गेले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे समाजातील मोठ्या वर्गात नाराजी पसरली असून आता समाजातील सर्व वर्गांमध्ये एकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतातील नागरिकांना योग्य मार्ग दाखवण्याची आवश्यकता असून तो मार्ग महात्मा गांधी यांच्या विचारातून मिळेल.
देश में छिड़े इस आंदोलन को शांतता के मार्ग की जरूरत है। मुझे खुशी है की @YashwantSinha जी इस राह पे चल पड़े है। इस गांधी शांति यात्रा में कई लोग शामिल होंगे ये मुझे विश्वास है। शांतिपूर्ण ढंग से यात्रा में शामिल होकर अपने विचार सरकार के सामने रखना इसका एकमात्र उद्देश्य है। pic.twitter.com/JTFx3hxXq7
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 9, 2020
भारतीय राज्यघटना धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतात यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या शांतता यात्रेसाठी शरद पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.
#CAA और #NRC को लेकर लोगों में भयभीतता है। अगर कागजात नही है तो लोगों को डर है की उन्हें सरकारद्वारा निर्माण किये गये केंप मे रहना होगा। यह परिस्थिति सरकारने आज पैदा की है। सरकार दमननीति आजमा रही है। pic.twitter.com/yE5VAdRg1Q
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 9, 2020
Web Title: Gandhi Yatra Begins at Gateway of India in Mumbai NCP President Sharad Pawar Showed a Green Flag.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं