महत्वाच्या बातम्या
-
व्हिडिओ कुठला तेच माहित नसताना बदनामीकारक ट्विट | आहेत भाजपचे गुजराती पदाधिकारी
एका जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला कोरोना किटमध्ये बांधून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं. स्मशानभूमीत आणल्यानंतर तो रुग्ण जिवंत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हा गंभीर आणि संतापजनक प्रकार मुंबईत घडल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत सुरेश नाखुआ यांनी एक ट्वीट केलंय. “हे धक्कादायक आहे. एक जिवंत माणूस बीएमसीने स्मशानभूमीत नेला. मला वाटतं की # महावसुली आघाडी सरकारचं स्मशानभूमीतून काही महावसुलीचं टार्गेट असेल,” असं सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
Corona Pandemic | केंद्राचाही सतर्कतेचा इशारा | मुख्यमंत्री उद्या संपूर्ण लॉकडाऊन घोषणा करणार
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज किंवा उद्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आज ( २० एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यामुळे लॉकडाऊन लावावा असाच सर्व मंत्र्यांचा आग्रह असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण | उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिलाय.
4 वर्षांपूर्वी -
मला लोकांना घाबरावायचे नाही, मात्र इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता - डॉ. संजय ओक
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. गेल्या 24 तासांदरम्यान येथे 58,924 नवीन रुग्ण समोर आले आहेत. या दरम्यान 351 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर आता मानले जात आहे की, दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात टोटल लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय पक्षाला रेमडेसिवीर मिळालीच कशी हा मूळ प्रश्न | चंद्रकांतदादा पाकिस्तान, चायना, देशाच्या घटनेवर बोलत बसले
आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो | मला जनतेचे आशीर्वाद - फडणवीस
देशात आणि राज्यात सध्या कोरोनामुळे सामान्य लोकं धास्तावलेली आहे. कोरोनाचा कहर एवढा वाढला आहे की आरोग्य यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने रुग्ण आणि त्यांचेच कुटुंबीय देखील चिंतेत आहेत. त्यात भाजप केंद्राकडे मदत मागायची सोडून राज्य सरकार कसं अडचणीत येईल याचीच आखणी करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार देखील संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा श्वास कोंडतोय अन दोन गुजराती नेत्यांची ऑक्सिजनवरून भिन्न विधानं | राज्याला बदनाम करणं हेच ध्येय?
आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५०३ रूग्णांचा मृत्यू तर ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले
आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर इंजेक्शन्स मुंबई महापालिकेच्या निवडणूक रणनीतीचा भाग होणार होती? | अनेक शंका बळावल्या - सविस्तर
ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक मोहित जैन, अंशुल केजरीवाल आणि शिरीष केजरीवाल यांनी ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शनच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेटी घेतली होती. तसेच अधिक पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा केली होती मात्र सदर चर्चा ही राज्य सरकारच्या मदतीची सांगून भाजप पक्षाकडे हा पुरवठा होणार होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यासाठी कंपनीच्या प्रमुख वितरकाचा संपर्क क्रमांक आणि कोणाला द्यायचं हे देखील कंपनीच्या वितरकाला आदेश देण्यात आले होते असं वृत्त आहे. देवेंद्र फडणवीसांना मुंबईत भेटणारे कंपनीचे मालक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आरोग्य मंत्र्यांना भेटले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांची चौकशी करताच इतकी तडफड हा कुठला महाराष्ट्रधर्म?
मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.
4 वर्षांपूर्वी -
पोलिसांना कायदा शिकवणारे फडणवीस जमावबंदी असताना मोठा मॉब घेऊन पोलीस ठाण्यात | पहा व्हिडिओ-फोटो
मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन
कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले . यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती रोज चिंताजनक होत चालली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजन, रेमेडेसिविर, लस सगळ्याच गोष्टींचा आता तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत ३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन असं वृत्त होतं. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती असं सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिशपणाचे होईल - महापौर
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला. यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहिम पुर्ववत व्हावी यासाठी केंद्र सरकारने मुंबईतील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिली. मात्र, आता त्यावरुन आता शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | काही व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खरोखरच फॉरवर्ड करण्याच्या योग्यतेचे असतात
देशभरात मेडिकल ऑक्सीजनचे संकट वाढत आहे आणि परिणामी इस्पितळांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांचे प्राण जात आहेत. आता केंद्र सरकार निवडणुकीच्या प्रचारातून सामान्य लोकांसाठी थोडा वेळ काढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने 50 हजार मॅट्रीक टन मेडिकल ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुसरी लाट भयानक | लोकांना गांभीर्य कळेना | राज्य कडकडीत लॉकडाऊनच्या दिशेने
मुख्यमंत्र्यांनी राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी त्याला सहकार्य करावे. मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागल्या. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढतच आहे. निर्बंध लावूनही काही जागी गर्दी दिसून येत आहे. आता नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर राज्यात पूर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागच्या वर्षीची टाळेबंदी आणि सध्याची संचारबंदी यात फरक असून आणखी कठोर निर्बंधांची गरज व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाकाळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्यसरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गुरुवारी (१४ एप्रिल) पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
१९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे
राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस
देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी