मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी: प्रकाश आंबेडकर

मुंबई: मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी झाली आहे, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
या देशातील केंद्र सरकार हे कंगाल आणि दारुड्या सारखे सरकार आहे. तर RSS हे देशातील आतंकवादी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद निकालावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या निकालाने समाधानी आहे. लोकांची कामं केली म्हणून आम्हाला अकोल्यात सत्ता दिली. तसेच काही जिल्हा परिषदांमध्ये आमचे सदस्य निवडून आले आहेत.
सीएए कायदा राबवून देशाला तुरुंग बनवण्याचा डाव केंद्र सरकारचा आहे. मात्र आम्ही हे कदापीही होऊ देणार नाहीत. नागपाडा दोन टाकी, मुंबई येथे जामिया काद्रिया अश्रफिया मदरशामध्ये #CAA #NRC कायद्याविरोधात मुस्लीम मौलानांशी संवाद साधला. pic.twitter.com/Ra36WLDz2Z
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 8, 2020
त्यांनी म्हटले की, सरकार चालवण्यासाठी सरासरी १३ लाख कोटी रुपये लागतात. मात्र, नवा अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एवढी रक्कम सरकारी तिजोरीत जमेल की नाही, याबाबत शंका आहे. केंद्र सरकारला साधारण १२ लाख कोटीची तूट पडेल. दारुडा व्यक्ती घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे केंद्र सरकार मालमत्ता विकत सुटले आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्राकडून नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)यासारखे मुद्दे पुढे केले जात असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अमेरिका – इराण युद्ध सुरू झाले तर त्याचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. नोटबंदी दरम्यान एनआरआय लोकांना शासनाने पैसे डिपॉझिट करण्यात सूट दिली होती, याद्वारे किती पैसे आले याची माहिती सरकारने द्यावी. देशाची आर्थिक स्थिती लपविण्यासाठी CAA, NRC मुद्दे भाजप कडून पुढे केले जात आहेत, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रवादी-काँग्रेस हे शेतात जे पिकतं त्याच्या नव्हे तर त्यावरील प्रक्रिया उद्योगांवरील प्रेमी आहे, असे आंबेडकर म्हणाले.
Web Title: VBA leader Prakash Ambedkar allegation on Modi government policies.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं