महत्वाच्या बातम्या
-
मनसेच्या बाबाराजे जाधवरावांच पुरंदरमध्ये शक्तिप्रदर्शन
मनसेचे शेतकरी आघाडीचे प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी सासवडमध्ये मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. शक्ती प्रदर्शनामार्फत त्यांनी थेट शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनाच आव्हाहन दिलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुढील वर्ष साखर उद्योगासाठी धोक्याची घंटा : शरद पवार
पुढील वर्षी केंद्र कारकरने साखर उद्योगाला म्हणजे उसाला ठरवून दिलेला देण साखर कारखान्यांना शक्य होणार नसल्याने पुढील वर्ष साखर उद्योगासाठी संकटच राहणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई पुण्यात कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे
कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाचा सर्वच थरातून कडाडून निषेध केला जात आहे. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आज सुट्टीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ महामोर्चे काढण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
भाजपामध्ये जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात : गजानन कीर्तिकर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी मित्रपक्ष भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, भाजपामध्ये जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात. सांगलीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना गजानन कीर्तिकर यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकांना अटक झाल्यास 'वर्षावर' शिवसैनिकांचा ठिय्या : उद्धव ठाकरे
नगर मधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ एप्रिलला अहमदनगर दौऱ्यावर जाऊन हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार पुणे-पिंपरीकरांचे आणि उत्तर भारतीयांसाठी रेल्वे फेऱ्या वाढवा
शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ज्या मूळ पिंपरीकरांनी निवडून दिले, त्यांच्या प्रवासाच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेण्यापेक्षा पिंपरीत राहणाऱ्या ‘उत्तर भारतीयांच्या’ प्रवासाच्या समस्या अधिक महत्वाच्या वाटू लागल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या 'छोले भटुरे' आंदोलनाला भाजपकडून 'सँडविच-वेफर्स-बर्फी'च उत्तर
उपोषणाच्या नावाने देशभरात सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून सामान्य जनतेचा खेळ चालू आहे का असच काहीस चित्र आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणा दिवशी पोटभर ‘छोले भटुरे’ खाऊन उपोषणाचा श्रीगणेशा केला होता तर आज स्वतःला ‘सच्चाग्रही’ समजणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी दबाके ‘सँडविच-वेफर्स-बर्फी’वर ताव मारला.
7 वर्षांपूर्वी -
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड, भाजप आमदार शिवाजी कार्डिलेना अटक
नगर मधील दोन शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर काही जणांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कार्डिले यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये शिवसैनिकांची निर्घृण हत्या, एनसीपीचे आमदार संग्राम जगताप अटकेत
काल नगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची क्रूर हत्या करण्यात आली होती. सध्या नगर जिल्ह्यातील तणावाचं वातावरण असून एनसीपीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातील ६ महापालिकांच्या पोटनिवडणुकीत भाजपला 'भोपळा'
राज्यातील महत्वाच्या सहा महापालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले वर्चस्व अबाधित राखून स्वतःची ताकद सिद्ध केली आहे, परंतु भाजपला या सहाही जागांवर भोपळा हाती लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
पवारांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही
मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारसाहेबांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही.
7 वर्षांपूर्वी -
भाजपचे धाबे दणाणले, महाराष्ट्रात पण लिंगायत समाजाचा भडका ?
महाराष्ट्राचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विधानाने संपूर्ण लिंगायत समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी. दिल्ली दरबारी याचे मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची शक्यता.
7 वर्षांपूर्वी -
अजित पवार म्हणजे शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद : शिवसेना
शिवसेनेला गांडूळाची उपमा देणाऱ्या अजित पवारांवर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अखेर श्रीपाद छिंदम १५ दिवसांसाठी नगर मधून तडीपार
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून १५ दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
हे 'महागलं', जनता महागाईने कोलमडण्याची चिन्हं आहेत
नव्या आर्थिक वर्षात तुमचा खिसा लगेच हलका होण्याची शक्यता आहे आणि गृहिणींचा स्वयंपाकाचा रोजचा खर्च सुद्धा महागाईने कोलमडण्याची चिन्हं आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ग्रामीण महाराष्ट्रात तीव्र 'पाणी-बानी'
ग्रामीण महाराष्ट्रात २६,३४१ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्चपासूनच उन्हाचा कडाका प्रचंड वाढल्याने ग्रामीण महाराष्ट्रात रोजच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अतिशय तीव्र होऊ लागली आहे.
7 वर्षांपूर्वी -
'पेट्रोल-डिझेलचे' भाव भडकले आणि नागरिकांची 'माथी' सुद्धा
देशाच्या आर्थिक वर्षाची सुरवात झाली ती पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आणि सकाळी घराबाहेर पडलेले नागरिक पेट्रोलपंपवर पेट्रोल-डिझेलचे भडकले दर पाहून संतप्त प्रतिक्रिया देताना पहायला मिळत आहेत. काही जण तर नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील आश्वासनांचा उजाळा देत, हेच का ते ‘अच्छे दिन’ असा संतप्त प्रश्न विचारात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय महामार्गावर 'राष्ट्रीय नागरिकांचा' खिसा रिकामा
राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर्थिक वर्षापासूनचा प्रवास महागणार आहे. कारण मोदीसरकारने राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल शुल्कात आता 6 टक्के इतकी वाढ केली आहे. तर वांद्रे – वरळी सी लिंकच्या टोलमध्ये थेट दहा रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची टीका, अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत 'गाजर' हलवा झाला
सामना अग्रलेखातून शिवसेनेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणावर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार पंतप्रधान व्हावे ही मनसेची प्रामाणिक इच्छा : बाळा नांदगावकर
देशभरात मोदींविरोधात तिसरी आघाडी जोर धरू लागल्याने तसेच त्या तिसऱ्या आघाडीचे नैतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याने करावे अशी राजकीय चर्चा अनेक पक्ष करत आहेत आणि त्यासाठी दिल्लीत गाठीभेटीचे सत्र सुरु झाले आहे.
7 वर्षांपूर्वी