निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभेच्या तारखा जाहीर होणार?

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख अद्याप जरी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकापूर्व सर्व तयारी सुरु केली आहे आणि त्यामधून हे संकेत मिळत आहेत. देशातील सर्व राज्यसरकारांना २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रशासकीय तयारी आणि तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यालाच अनुसरून सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना केंद्रीय निवडणूक आयोगाने लेखी पत्र पाठविले असून त्यात फेब्रुवारी महिन्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करता नाहीत, असे नमूद केले आहे. त्याबरोबरच, केंदीय निवडणूक आयोगाने दुसरे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात येतील. त्यानुसार, मूळ निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील, अशी शक्यता आहे.
प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. तसेच, देशभरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गृह मंत्रालयासोबत संपूर्ण आढावा घेतल्याचे वृत्त आहे. तसेच देशभरात निमलष्करी दलाची आवश्यकता पाहून नेमक्या किती टप्प्यात निवडणुका घेता येतील आणि कधी घ्यायच्या यासंदर्भात सखोल चर्चा सदर बैठकीत झाली. दरम्यान, पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोगाची केंद्रीय गृहमंत्रालयासोबत अंतिम बैठक आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं