मोदींच्या हत्येचा कट रचल्याच्या बातम्या म्हणजे नवे सहानुभूती कार्ड : शरद पवार

पुणे : मी जेव्हा एका सीआयडीच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याशी बोललो तेव्हा त्यांनी माहिती दिली की, जेव्हा अशा प्रकारची धमकीची पत्रे येतात तेव्हा त्याची वाच्यता प्रसार माध्यमांमध्ये केली जात नाही. तर थेट सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती देऊन सतर्क केलं जातं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेली धमकीची पत्रं ही निव्वळ स्टंटबाजी आहे अशी थेट टीका त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या बातम्या सत्ताधाऱ्यांनी केवळ सहानुभूतीसाठी जाणीवपूर्वक पसरविल्याचा आरोप शरद पवारांनी केला. इतकाच नव्हे तर ते धमकी पत्राच्या खरेपणावर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली. भीमा – कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नुकतीच काही जणांना अटक झाली होती. त्यानंतर झालेल्या झाडाझडतीत ती धमकीची पत्र सापडल्याचा दावा तपास करणाऱ्या पोलिसांनी केला होता.
पुढे पवार उपस्थितांना संबोधित करताना असं म्हणाले की, एल्गार परिषदेतील काही जणांना नक्षलवादी ठरवून अटक करण्यात आलं. तसेच भीमा – कोरेगाव हिंसाचारात कोण सामील होत, परंतु जे हिंसाचारात सहभागी नाहीत त्यांच्यावर सरकार कारवाई करत असून हा सत्तेचा दुरूपयोग असल्याचा आरोप सुद्धा पवारांनी केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं