सीएसएमटी स्टेशनजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू तर 31 जखमी - मुंबईकरांचा जीव झाला स्वस्त

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडून असलेला पादचारी पूल गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास कोसळला आणि या दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा मृत्यू झाला असून ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा हा हिमालया पादचारी पूल कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.
थोड्याच अंतरावर असलेल्या ट्रॅफिक सिग्नल च्या लाल दिव्याने बरेच प्राण वाचवले आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेच्या अवघ्या काही मिनिटातच महापालिकेची डिसास्टर मॅनेजमेंट टीम आणि अग्निशमन दल दाखल झाले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये हा पूल धोकादायक नसून आणि किरकोळ दुरुस्ती ची गरज असल्याची नोंद करण्यात आली होती. परंतु या घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट करणारी टीम नक्की काय करते यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महापालिका आणि रेल्वे दोघांनी आपले हात झटकत याची जिम्मेदारी एकमेकांवर ढकलण्याचे काम केले आहे. अर्थातच मुंबईकरांचा जीव खूप स्वस्त आहे आणि आपण काही केलं तरी सामान्य मुंबईकराला आपण सहज मूर्ख बनवू शकतो या भ्रमातच नेहमी महापालिकेत असलेली शिवसेना दिसते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं